राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यात सुनील शेळके यांनीही मोठं विधान केलं. ...
महाराष्ट्र नाराज आहे त्यात मीही नाराज आहे असं बोलायला हरकत नाही असं सांगत रोहित पवारांनी पक्षातील नाराजीच्या प्रश्नावर पत्रकारांना थेट उत्तर देणं टाळलं. ...