राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
रोहित पवार कार्यकर्त्यांना नोकराप्रमाणे वागवतात, कार्यकर्ता जिवंत राहू नये अशी त्यांची कार्यपद्धती आहे असा आरोप राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्याने आरोप केला. ...
विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे भाजपातील अनेक इच्छुक नाराज आहेत. त्यात काहींचा मतदारसंघ मित्रपक्षाला सुटेल या शक्यतेने अनेकांनी पक्षांतर करण्याला प्राधान्य दिलं आहे. ...