राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Politics : भाजपला ही संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर असेल, आमच्या मनात तेच नाव आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. अर्थात आमचे नेतृत्व त्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ...
Dindori Assembly Election 2024 : दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या नरहरी झिरवळांचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच टेन्शन वाढवले आहे. शिंदेंच्या माजी आमदाराने झिरवळ यांच्या विरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. ...
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण असेल? अशी चर्चा सुरू आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ...
प्रत्येक नेत्याला वाटतं मी ३० वर्ष निवडून आलोय मग आता मला काही होणार नाही. मात्र तेव्हा कार्यकर्त्यांची एकसंघ फळी होती ती आता दुभंगली आहे असं दिलीप खोडपे यांनी सांगितले. ...
Bacchu Kadu Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेते पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशात बच्चू कडू यांनी अजित पवार शरद पवारांकडे दिसतील, असा मोठा दावा केला आहे. ...
शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...