राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar vs Manohar Chandrikapure news: अजित पवारांनी भाजपाच्या जावयाला आपल्या पक्षात घेऊन तिकीट देत विश्वासघात केल्याचा आरोप मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाच्या तीन बड्या नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश करताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. कोणाशी होणार थेट लढत? जाणून घ्या... ...
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा राजकीय प्रवास करत प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना लागलीच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजयकाका पाटील यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. रोहित पाटील यांच्याविरोधात संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...