राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Dasara Melava 2025: राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, शेतकरी बांधवांवर कोसळलेले अस्मानी संकट अशा कठीण परिस्थितीचा विचार करता दसरा मेळावे घेण्यावरून राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...
कुठलीही गोष्ट आली की आम्ही केली असं ते सांगत असतात. याची त्यांना लाज वाटली पाहिजे. अनेक योजना आम्ही आणल्या आहेत असा टोलाही आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना लगावला. ...