राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
रनवे एकोणतीस असताना, सुरक्षित असताना, फ्लॅट असताना, कुठलेही टेन्शन तेथे नसताना, तेथे सूर्याचा पण त्रास नसताना सारखे सारखे 'मला रनवे ११ पाहिजेल,' असे त्याठिकाणी सांगण्यात आले. असेही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले. ...
खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर व मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र येत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी रणनीती आखली ...