29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
मुसळधार झालेल्या पावसानं मंगळवारी मुंबईकरांना चांगलंच झोडपलं. यामुळे मुंबईकरांसह मुंबईबाहेरुन आलेल्या नागरिकांचीही पुरती दाणादाण उडाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती तर पाण्यात गेलेल्या मुंबईनं पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलैच्या आठवणीनं धडक ...
२६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुरानंतर मुंबईचे प्रशासन व व्यवस्था पुरासारख्या संकटाशी लढण्यात किती अपुरी पडते याचं चित्र स्पष्ट झालं होतं. मंगळवारी २९ आँगस्ट रोजी झालेल्या पावसाने त्या दिवसाची पुन्हा आठवण करुन दिली. ...
मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला असून विक्रोळीत इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे विक्रोळीत दरडही कोसळली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. ...
दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून धावणा-या मुंबईकराचं पोट भरण्याचं काम करणा-या डबेवाल्यांना संपुर्ण रात्र लोकल ट्रेनमध्येच घालवावी लागली. त्यामुळे आज डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे. ...
मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे रस्तेच नव्हे, तर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक कासवगतीनं सुरु आहे. ...
गेल्या सहा महिन्यात आलेल्या पावसामुळे भारत, नेपाळसह दक्षिण आशियामध्ये अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरामध्ये आतापर्यंत 1000 हजारपेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...