भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू, मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते. Read More
निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोनाविरुद्ध मृत्युशी त्यांची झुंज अपयशी ठरली ...