Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे लोकसभेसाठी पक्षाचा चेहरा असू शकत नाहीत. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे कदापि मान्य होणारे नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले. ...
Maharashtra Political Crisis: एकीकडे आदित्य ठाकरे पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरे काढत असून, दुसरीकडे दिवसेंदिवस शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे जिथे जातात तिथे तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आम्ही शिवसेनेसोबतच राहू, असे आश्वासन शिवसैनिक देत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. ...