Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: शिवसेनेत फूट पाडून व त्या बळावर मुंबईवरील भगवा उतरवण्याचे तुमचे स्वप्न हे काय बाळासाहेबांचे स्वप्न होते का, अशी संतप्त विचारणा भाजपला करण्यात आली आहे. ...
Maharashtra Political Crisis: कलानगरातून नगरविकास खात्याच्या फाइल्स एकनाथ शिंदे यांच्याकडे यायच्या अन् सह्या करण्यासाठी दबाव टाकला जायचा, असा मोठा दावा भाजपने केला आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले खासदार तब्बल वर्षभरानंतर मतदारसंघात फिरकत असून, यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरची मोठीच चर्चा आहे. ...
Maharashtra Political Crisis: भाजप विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असे, याची आठवण काँग्रेसने करून दिली. ...