Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: स्वत:चा विचार नाही, आचार नाही. फक्त सत्ता पाहिजे. काही वाट्टेल ते करू, पण सत्ता पाहिजे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. ...
Maharashtra Political Crisis: तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही शिवसैनिकाला लाचार व्हायला लावले, अशी घणाघाती टीका शिंदे गटातील खासदाराने केली आहे. ...