ठाण्याच्या मतदारांनी बोलघेवडेपणापेक्षा काम करणाऱ्या खासदाराला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे जे निवडणुकीपूर्वी टीका करत होते, त्यांनाच त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिल्याची गंभीर टीका ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...
ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी केंद्रांबाहेरील कडक पोलीस बंदोबस्त, अंग पोळून काढणारा उन्हाळा आणि २५ ते ३० फेऱ्यांचे सव्यापसव्य यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांनी सकाळी व दुपारी पक्ष कार्यालयात बसून निकाल पाहणे पसंत केले. ...
ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांवर शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने अपेक्षेप्रमाणे आपले वर्चस्व कायम राखले आहे. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचार काळात ठिकठिकाणी काढलेल्या रॅली तसेच वैयक्तिक गाठीभेटी यासह कल्याण पूर्वेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि डोंबिवलीत झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
विकासकामे केलेली आहेत, त्यांची पोचपावती मतदारांनी दिलेली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जनतेचा विश्वास संपादन करून त्यांच्या विश्वासाला कोणत्याही स्वरूपाचा तडा न जाऊ देता, विकासकामे करणार आहे. ...
ठाणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. ठाण्यातील प्रचारात प्रथमच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणेऐवजी ‘अब की बार मोदी सरकार’ ही घोषणा दिली होती. नेमक्या त्या घोषणेमुळे मोदीलाटेचा मोठा लाभ शिवसेनेचे राजन विचारे यांना झाला आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: ... ...