2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून पहिल्याच कसोटी मालिका पराभवाचा सामना करणा-या भारतीय कर्णधार विराट कोहलीवर काय परिणाम झाला हे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं. ...
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाला केपटाऊन कसोटीपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. आफ्रिकेने भारतावर 135 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. ...
हा सर्वोत्तम कसोटी सामना आहे. कुठलाही संघ आम्ही वर्चस्व गाजवित आहो, हे छातीठोकपणे सांगू शकत नाही. हेच उभय संघांतील गोलंदाज व फलंदाजांच्याबाबतीत म्हणता येईल ...
लुंगी एन्गिडीने भारताच्या के. राहुल (४) आणि कर्णधार विराट कोहली (५) व रबाडाने मुरली विजयला (९) धावांवर बाद करुन भारताची दुस-या डावात ३ बाद ३५ अशी दयनीय अवस्था केली. ...
मैदानाचा काही भाग ओलसर असल्यामुळे चेंडु सतत ओला होऊन गोलंदाजांना याचा त्रास होत असल्याची तक्रार कोहलीने मैदानातील पंचांकडे केली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना चेंडूवर ग्रिप घेणं कठीण होत असल्याचा विराटचा दावा होता. पण... ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. डिव्हिलियर्स 80 धावांवर मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर बाद झाला, एल्गरने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. ...