सूर्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी डहाणू, पालघर तालुक्यातील गावांना ३० डिसेंबरला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे; तर दोन दिवसांपूर्वी उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात आले आहे. ...
तामसवाडी येथील बोरी धरणाच्या दोन्ही पाटचाऱ्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारी तसेच बाजरी व काही प्रमाणात गहू व हरभरा पेरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. ...
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक गुणाले यांना कोयना धरणाचे नाव बदलणे व प्रवेशद्वारावर अश्वारूढ पुतळा उभारण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. ...
उमरखेड तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे इसापूर धरणाचे पाणी अखेर कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना जीवदान मिळणार आहे. ...
गोदावरी पाटबंधारे महामंडळास स्वायत्त दर्जा देण्याची घोषणा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. स्वायत्तता दिल्याने महामंडळ खरेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल की, सरकारी निधीअभावी कोलमडून जाईल? या महामंडळाला स्वायत्ततेची गरज आहे की, आणखी काय ...
Jiverekha Dam Water : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील जीवरेखा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
गिरणा पाटबंधारे विभागामार्फत बुधवारी गिरणा जामदा उजव्या कालव्याला पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून या पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा अभियंता चव्हाण यांनी केले आहे. ...
राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, मेट्रो, विमानतळ यांसारख्या विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येते. ...