देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला मोठं यश मिळालं आणि एनडीएचं अबकी बार ४०० पारचं स्वप्न भंगलं, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधींना सोपवलं आहे. ...
Congress MP Rahul Gandhi News: मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली. ...
इंडिया आघाडीची स्थापना करणारे नितीशकुमार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासोबत एनडीएत गेले होते. यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे वेगळे लढण्याची घोषणा केली होती. ...