देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) विदर्भामध्ये विशेष यश मिळावलं होतं. या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पूर्व विदर्भातील ९९ टक्के जागांवर लढेल ...
Wayanad Lok Sabha Constituency By Election: काँग्रेसने वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची यावरून केरळमधील सत्ताधारी पक्ष असलेली डावी आघाडी संभ्रमात आहे. ...