देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भाजप आणि शिवसेनेत या आयारामांना मोठ्या आदराने सामावून घेतले गेले आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पक्षाकडून संधी मिळेल या आशेवर अनेक कार्यकर्ते आहेत. अशा वेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी ...
इंदापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. परंतु, इंदापूर पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने हर्षवर्धन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. ...
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काँग्रेसनेते नाना पटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकात खैरे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहेत. ...