देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Uddhav Thackeray on BJP and Congress: सावरकर आणि नेहरूंचे नाव घेत काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सातत्याने एकमेकांना लक्ष्य करतात. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांना खडेबोल सुनावले. ...
Yogi Adityanath And Priyanka Gandhi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधींनी पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग संसदेत घेऊन येण्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
पाकिस्तानी नेते फवाद चौधरी यांनी लिहिले की, 'जवाहरलाल नेहरूंसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नातीकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? आजपर्यंत एकाही पाकिस्तानी संसद सदस्याने असे धाडस दाखवले नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. ...