श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महाराष्ट्रात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवारांची विधाने आणि मोदी डिग्री, अदानींबाबत घेतलेली भूमिका यावरून राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येतील का अशी चर्चा सुरू झाली आहे ...
भाजपने यावेळी तिकिट न दिल्याने अनेक नेत्यांमध्ये आक्रोश दिसत आहे. कुणी थेट पक्ष बदलण्याची भाषा करत आहेत, कुणी रडत आहेत, तर कुणी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीसंदर्भात बोलत आहेत. यामुळे भाजप समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. ...