श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
रवींद्र धंगेकर म्हणाले की, हा पक्ष शिवसेनाप्रमुखांचा आहे. सत्ता जर जनतेच्या कामाच्या आड येत असेल तर सत्ता बाजूला ठेवा आणि तुम्ही जनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरा असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यांच्या कुशीत तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत. ...
सत्तेत असलेल्या भाजप महायुतीमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही. नवे भागीदार येणार नाहीत, विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...