अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘लुटियन्स’ परिसरातील सरकारी बंगल्याचा पत्ता क्रमांकासह पहिल्यांदाच २००४ मध्ये विशेषत: अटलबिहारी वाजपेयी यांच्यासाठी बदलण्यात आला. ...
नेहरू खरोखर द्रष्टे होते. त्यांचे भाकीत खरे ठरले. १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. नंतर ते १९९८ मध्ये १३ महिन्यांसाठी आणि १९९९ मध्ये पूर्ण पाच वर्षांसाठी पंतप्रधान बनले. ...
अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लोकसभेत दुर्गेची उपमा दिली होती. इंदिरा गांधी यांचा विषय येताच या वक्तव्याची आठवण काढली जाते. ...
मराठी साहित्यावर आणि कवितांवर त्यांचे विशेष प्रेम होते. १९८० ला झालेल्या गीतरामायणाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमालाही वाजपेयी उपस्थित होते. मराठी भाषेचे अफाट ज्ञान असलेल्या वाजपेयींनी रमणबागेत केलेल्या मुद्देसूद भाषणाने तेव्हा उपस्थित श्रोते पावसातही ...
राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते. ...
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जडणघडण झाली तीच मुळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांतून. १९४० च्या दशकापासून नारायणराव तरटेंच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक म्हणून सुरू केलेला प्रवास पंतप्रधानपदापर्यंत येऊन पोहोचला. ...
अटलजींनी जेव्हा तेरा दिवसांसाठी शपथ घेतली होती, शपथविधी झाल्यानंतर मावळते पंतप्रधान नरसिंह राव अटलजींना थोडेसे बाजूला घेऊन एकांतात म्हणाले होते, ‘‘अटलजी, आता आमचे अपुरे काम जरूर, लवकरात लवकर पुरे करा...’’ ...
ज्यांना राजकारणात यायचंच नव्हतं त्या अटलजींवर साऱ्या देशाच्या आशा केंद्रित झाल्या. त्यांनी त्यांच्या एका लेखात म्हटलं, ‘राजकारणात येणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. ...