अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
नाशिक : आपल्या शांत व सौम्य स्वभावामुळे, मात्र सर्व प्रश्नांवर घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात आदराचे स्थान मिळविलेले भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्यामुळे निर्मळ मनाच्या ...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवला शहरातून शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजता सर्वपक्षीय मूक पदयात्रा काढण्यात आली. याचवेळी शहरवासियांनी स्वेच्छेने बंद पाळला. दरम्यान टिळक मैदानावर सर्व पक्षीय शोकसभा होऊन वाजपेयी य ...
गेली ७० वर्षं पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानं पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी नवज्योतसिंग सिद्धू खास भेट घेऊन गेले. ...
अकोला : अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालयात अटलजींना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीमध्ये होत असलेल्या अंतिम संस्काराचा वेळ साधत अकोल्याच्या कार्यालयात एकशे पाच पणत्या लावून आगळी-वेगळी श्रद्धांजली दिली. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौक येथील बेमुदत आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमापूजन करून मराठा आंदोलकांनी आदरांजली वाहिली. ...