एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
प्राप्त माहितीनुसार, देशांतर्गत मार्गावर कंपनीच्या विमान फेऱ्यांत २५ टक्के वाढ होणार आहे तर आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान फेऱ्यांत २० टक्के वाढ करण्याची योजना कंपनीने आखली आहे. ...
एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची ही सेवा प्रवाशांकरिता उपलब्ध होईल. येत्या काही दिवसांत कंपनीच्या ताफ्यात आणखी काही नवीन विमाने समाविष्ट होणार असून त्यामुळे कंपनीला देखील या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. ...