शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोबाईल हिसकावतांना तरुणीचा मृत्यु: आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 00:03 IST

नाशिक - मुंबई पूर्व द्रूतगती महामार्गावरुन मैत्रिणीसह रिक्षाने जाणाऱ्या कन्मीला रायसींग (२७, रा. कलीना, मुंबई) या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावतांना तोल जाऊन तिचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी अल्केश अन्सारी (२०) आणि सोहेल रमजान अन्सारी (१८, रा. दोघेही भिवंडी) या सराईत चोरटयांना अवघ्या २४ तासातच नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

ठळक मुद्दे तपास पथकाला २५ हजारांचे बक्षीसदोघांवरही चोरीचे गुन्हे दाखलदोघांनाही गांजा आणि दारुचे व्यसन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नाशिक - मुंबई पूर्व द्रूतगती महामार्गावरुन मैत्रिणीसह रिक्षाने जाणाऱ्या कन्मीला रायसींग (२७, रा. कलीना, मुंबई) या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावतांना तोल जाऊन तिचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी अल्केश अन्सारी (२०) आणि सोहेल रमजान अन्सारी (१८, रा. दोघेही भिवंडी) या सराईत चोरटयांना अवघ्या २४ तासातच नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. या तपास पथकाला २५ हजारांचे बक्षीस अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी शुक्रवारी घोषित केले आहे.ठाण्यातील विवियाना मॉलमधील एका स्पाध्ये ब्युटीशियनचे काम करणाºया किन्मला आणि लालगुरसांगी फॅन्चुन (३०, रा. कलीना, मुंबई) या मुळच्या मणिपूर मिजोराम येथील रहिवाशी असलेल्या तरुणी मुंबईतील कालीना येथे वास्तव्याला होत्या. नेहमीप्रमाणे आपले स्पामधील काम आटोपून ९ जून २०२१ रोजी रात्री ७.५० वाजण्याच्या सुमारास मॉल समोरील रिक्षाने सांताक्रूझला जाण्यासाठी बसल्या. त्या ठाण्यातील तीन हात नाका येथून रिक्षाने मार्गक्रमण करीत असतांना एका मोटारसायकलवरुन आलेल्या अल्केश आणि सोहेल या दोघांनी किन्मला हिच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावला. अचानक घडलेल्या या घटनेने भांबावलेली किन्मला तोल जाऊन रिक्षातून खाली कोसळली. यात तिच्या डोक्याला जबर मार लागला. स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, दिनेश चव्हाण, सचिन बाराते आदी १७ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकांची निर्मिती करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरलेल्या मोबाईलच्या आधारेच या पथकांनी या दोघांनाही भिवंडीतून अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील मोबाईलसह एक मोटारसायकल तसेच अन्य चोरीमधील चार मोबाईल असा एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.............................दोघांवरही चोरीचे गुन्हे दाखल-दोघांचेही शिक्षण आठवीपर्यंत झाले असून ते बेरोजगार आहेत. त्यांचे आई वडिल मोलमजूरी करतात. अल्केश याच्याविरुद्ध कोनगावमध्ये तर सोहेल याच्याविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी याआधीही अशाच प्रकारचे १० ते १२ गुन्हे केल्याची बाबही चौकशीत समोर आली आहे. दोघांनाही गांजा आणि दारुचे व्यसन आहे.................................तपास पथकाला शाबासकी-नौपाडा पोलिसांनी २४ तासांमध्ये आरोपींना जेरबंद केल्याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. अशा गुन्हयांवर प्रतिबंध करण्यासाठी शहरांतर्गत आणि महामार्गावर पोलिसांची गस्त वाढविण्यात आल्याचे उपायुक्त अंबुरे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र