शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

यंदा हापूस आंब्याचे ३५ टक्केच उत्पादन, हवामान बदलाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:17 IST

दुबार थंडी आणि पहिला मोहोर गळून पडल्याने यंदा फक्त ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन येईल, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना आहे. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले

ठाणे : दुबार थंडी आणि पहिला मोहोर गळून पडल्याने यंदा फक्त ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन येईल, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना आहे. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले, तरी त्याचे दर सर्वसामान्यांना परवडेल, असेच आहेत, अशी माहिती संस्कारचे पदाधिकारी विष्णू रानडे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, बाहेरचे विक्रेते कर्नाटकचा आंबा आणि कोकणातील आंबा मिक्स करून विकत असल्याचा आरोप कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केला. 

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव १ ते १० मे या कालावधीत आयोजिला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी उद्घाटन होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. १५ वर्षांपूर्वी आंबाविक्री ही दलालांच्या हाती होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता. शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळ घालून कोकणातील शेतकºयांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. या महोत्सवातून गवतात पिकलेला आंबा ग्राहकांना मिळणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. महोत्सवात यंदा ५० स्टॉल्स असून त्यातील ४० स्टॉल्स हे आंब्याचे आणि उर्वरित १० स्टॉल्स हे महिला बचत गटांना देण्यात आले आहेत.

या स्टॉल्सवर आंबापोळी ते पन्हे अशी विविध प्रकारांची कोकणातील उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. २०१६ साली एक लाख ८० हजार हेक्टरमध्ये तीन लाख २० हजार मेट्रिक टन उत्पादन येत होते. ते खाली येऊन २०१७ साली दोन लाख ५६ हजार मेट्रिक टन आणि २०१८ साली १ लाख २८ हजार मेट्रिक टन आले. मुंबईत ३६० कोटी रुपयांच्या आंब्याची विक्री होते. त्यातील १०० कोटी रुपयांच्या आंब्याची निर्यात होते, अशी माहिती रानडे यांनी दिली. गेल्या वर्षी या महोत्सवात जवळपास सव्वादोन कोटींची खरेदीविक्री झाली. यंदाच्या महोत्सवात तीन कोटीपर्यंत आंब्याची उलाढाल जाऊ शकते, अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

टॅग्स :Mangoआंबा