शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

यंदा हापूस आंब्याचे ३५ टक्केच उत्पादन, हवामान बदलाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:17 IST

दुबार थंडी आणि पहिला मोहोर गळून पडल्याने यंदा फक्त ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन येईल, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना आहे. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले

ठाणे : दुबार थंडी आणि पहिला मोहोर गळून पडल्याने यंदा फक्त ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन येईल, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना आहे. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले, तरी त्याचे दर सर्वसामान्यांना परवडेल, असेच आहेत, अशी माहिती संस्कारचे पदाधिकारी विष्णू रानडे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, बाहेरचे विक्रेते कर्नाटकचा आंबा आणि कोकणातील आंबा मिक्स करून विकत असल्याचा आरोप कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केला. 

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव १ ते १० मे या कालावधीत आयोजिला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी उद्घाटन होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. १५ वर्षांपूर्वी आंबाविक्री ही दलालांच्या हाती होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता. शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळ घालून कोकणातील शेतकºयांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. या महोत्सवातून गवतात पिकलेला आंबा ग्राहकांना मिळणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. महोत्सवात यंदा ५० स्टॉल्स असून त्यातील ४० स्टॉल्स हे आंब्याचे आणि उर्वरित १० स्टॉल्स हे महिला बचत गटांना देण्यात आले आहेत.

या स्टॉल्सवर आंबापोळी ते पन्हे अशी विविध प्रकारांची कोकणातील उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. २०१६ साली एक लाख ८० हजार हेक्टरमध्ये तीन लाख २० हजार मेट्रिक टन उत्पादन येत होते. ते खाली येऊन २०१७ साली दोन लाख ५६ हजार मेट्रिक टन आणि २०१८ साली १ लाख २८ हजार मेट्रिक टन आले. मुंबईत ३६० कोटी रुपयांच्या आंब्याची विक्री होते. त्यातील १०० कोटी रुपयांच्या आंब्याची निर्यात होते, अशी माहिती रानडे यांनी दिली. गेल्या वर्षी या महोत्सवात जवळपास सव्वादोन कोटींची खरेदीविक्री झाली. यंदाच्या महोत्सवात तीन कोटीपर्यंत आंब्याची उलाढाल जाऊ शकते, अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

टॅग्स :Mangoआंबा