शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

यंदा हापूस आंब्याचे ३५ टक्केच उत्पादन, हवामान बदलाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:17 IST

दुबार थंडी आणि पहिला मोहोर गळून पडल्याने यंदा फक्त ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन येईल, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना आहे. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले

ठाणे : दुबार थंडी आणि पहिला मोहोर गळून पडल्याने यंदा फक्त ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन येईल, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना आहे. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले, तरी त्याचे दर सर्वसामान्यांना परवडेल, असेच आहेत, अशी माहिती संस्कारचे पदाधिकारी विष्णू रानडे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, बाहेरचे विक्रेते कर्नाटकचा आंबा आणि कोकणातील आंबा मिक्स करून विकत असल्याचा आरोप कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केला. 

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव १ ते १० मे या कालावधीत आयोजिला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी उद्घाटन होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. १५ वर्षांपूर्वी आंबाविक्री ही दलालांच्या हाती होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता. शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळ घालून कोकणातील शेतकºयांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. या महोत्सवातून गवतात पिकलेला आंबा ग्राहकांना मिळणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. महोत्सवात यंदा ५० स्टॉल्स असून त्यातील ४० स्टॉल्स हे आंब्याचे आणि उर्वरित १० स्टॉल्स हे महिला बचत गटांना देण्यात आले आहेत.

या स्टॉल्सवर आंबापोळी ते पन्हे अशी विविध प्रकारांची कोकणातील उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. २०१६ साली एक लाख ८० हजार हेक्टरमध्ये तीन लाख २० हजार मेट्रिक टन उत्पादन येत होते. ते खाली येऊन २०१७ साली दोन लाख ५६ हजार मेट्रिक टन आणि २०१८ साली १ लाख २८ हजार मेट्रिक टन आले. मुंबईत ३६० कोटी रुपयांच्या आंब्याची विक्री होते. त्यातील १०० कोटी रुपयांच्या आंब्याची निर्यात होते, अशी माहिती रानडे यांनी दिली. गेल्या वर्षी या महोत्सवात जवळपास सव्वादोन कोटींची खरेदीविक्री झाली. यंदाच्या महोत्सवात तीन कोटीपर्यंत आंब्याची उलाढाल जाऊ शकते, अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

टॅग्स :Mangoआंबा