शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

ब्रह्मांड कट्टयावर जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात संपन्न, जलसंवर्धन, देवराई प्रकल्प,  जैवविविधता या विषयावंर माहिती सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:59 IST

ब्रह्मांड कट्टयावर जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जलसंवर्धन, देवराई प्रकल्प, जैवविविधता या विषयावंर माहिती सादर केली .

ठळक मुद्देब्रह्मांड कट्टयावर जागतिक वसुंधरा दिन संपन्नजलसंवर्धन, देवराई प्रकल्प,  जैवविविधता या विषयावंर माहिती सादर आपल्या सभोवताली वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे -  प्रा. डॉ. संजय जोशी

ठाणे : ब्रह्मांड सामाजिक-सांस्कृतिक मंडऴा तर्फे ब्रह्मांड कट्टयावर पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने सांज स्नेह सभागृहात जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात तीन विषय घेण्यात आले प्रथम जल संवर्धन हा विषय वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत यांनी त्यांच्या दमदार शैलीत मांडला. दूसरा देवराई प्रकल्पाची सविस्तर माहीती पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव संगीता जोशी यांनी दिली.  तर तीसरा विषय जैवविविधता या विषयावर सोमय्या कॉलेजचे मा. प्राध्यापक डॉ. संजय जोशी विशद केला. 

    कार्यक्रमाची सुरुवात वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत यांनी जल संवर्धन या विषयाची सुरुवात करताना आज वसुंधरा दिवस चांगला आहे. जगात जेवढ्या भाषा आहेत त्या भाषेत मातृभूमि हा शब्द आहे. आपली पृथ्वी ही मातृभूमि आहे. पर्यावरण व वसुंधरा हे ऐकमेकांना पुरक शब्द आहेत. मानवी जीवनात अशी एकही गोष्ट नाही जी आई आपल्याला पूरवित नाही.  पृथ्वी ही आपली माता आहे. तिने आपल्यासाठी अनेक गोष्टी दिल्या आहेत. मातेची सेवा करणे हे क्रमपाप्त आहे त्यामुळे वसुंधरा दिन वेगळा साजरा करण्याची आवश्यकता का भासावी असे उलट प्रेक्षकांना विचारले. मातेची रोज सेवा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भागवत यांनी केले. वसुंधरा संजीवनी मंडळ ही स्वयंसेवी संस्था २०१६ पासून ठाणे जिल्ह्यात मुरबाड शहापूर या अदिवासी क्षेत्रात पाणी संवर्धन,  पाणी व्यवस्थापन व ग्रामीण शिक्षण व विकास यासाठी कार्यरत आहे.  

शहापूर मुरबाड या भागात प्रति वर्षी २५०० मि. मि. पाऊस पडून ही नियोजना अभावी सर्व पाणी वाहून जाते व ऑक्टोबर नंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य असते.  पाण्यासाठी महीलांना व मुलांना ३ ते ४ कि. मी. चालावे लागत्,  यामुळे वर्षातील सात महीने शिकणे शक्य नसते. शेती फक्त पावसावरच अवलंबून आहे. पावसाळ्यानंतर उदरनिर्वाहासाठी इतर गावात भटकणे ही नित्याची बाब झाली आहे. तरुण मुला मुलींमधिये शिक्षण व कौशल्याचा अभाव म्हणून तुटपुंज्या पगारासाठी वणवण. पिढ्यानपिढ्या दुर्लक्षित समाज व दारिद्रय रेषेखालील जीवन. हे सर्व येथील अदिवासी बांधव खडतर जीवन जगतामा आपण शहरातील लोक आणि १३ औद्योगिक वस्त्यांतील कारखाने मात्र मुरबाड, शहापूर परिसरातून भातसा, तानसा, बारवी, वैतरणा इ. धरणातून सातत्याने मिळणाऱ्या पाण्यामुळे प्रगति आणि आर्थिक विकास करीत आहेत. या पाण्यावर त्यांचा अधिकार नाही का?  निश्चित आहे. यासाठी ग्रामीण स्थानिक स्तरावर पावसाच्या पाण्याचा साठा करण्यासाठी वनराई बंधारे,  चेक डँम्स,  जुन्या डैम्सचे,  तलावांचे आणि नद्यांचे पुमरुज्जीवन,  जलयुक्त शिवार,  सेंद्रिय शेती,  शेतीपुरक व्यावसायासाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था करणे व जैविक वैविध्यासाठी उपयुक्त वृक्षारोपण ह् कार्यक्रम हाती घेऊन सातत्याने राबविण्याची नितांत गरज आहे.  नेमक्या याच उद्देशाने वसुंधरा या गावकरी व आदिवासी बांधवांबरोबर कार्य करीत आहे. मागील दोन वर्षांमध्ये वसुंधराच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळाला.  दुबार पिकासाठी पाणी उपलब्ध झाले आणि स्वविकासासाठी काम करण्याचा आत्मविश्वास त्यांच्या मध्ये निर्माण झाला. वर्ष २०१६ मध्ये २२ वनराई बंधारे व वर्ष २०१७ मध्ये ४४ वनराई बंधाऱ्यांची बांधणी. रोटरी व वैयक्ती देणगीतून 3 चेक डैम बांधणी,  वृक्षदानातून ११०० फळझाडांची लागवड व जोपासना,  कनकविरा नदीचे पुनरुज्जीवन करुन ५ गावांना भरघोस फायदा,  महीलांसाठी व युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाला,  शाळकरी मुलींसाठी सायकलींचे वाटप व शिवणयंत्राचे वाटप,  सतत जनजागृति व लोकसहभागातून शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन ही कामे वसुंधरा संजिवनी मंडळाट्यावतीने केली जात आहेत. पर्यावरण दक्षता मंचच्या संगीता जोशी यांनी देवराई याबाबत स्लाइड शो सह सादरीकरण करताना स्पष्ट केले की शेकडो वर्षापासून भारतात देवराईचे अस्तित्वात आहे.  पंरतू सध्या आपण नैसर्गिक साधन संपत्ती आपण ओरबडून घेतोय.  त्यामुळे  जीव साखऴी धोक्यात येत आहे.  देवराई म्हणजे दाट जंगल असते.  देवराई म्हणजे पुर्वी देवळांच्या व देवाच्या नावाने राखुन ठेवलेले जंगल त्यामुळे खुपच जैवविविधचा या मध्ये उपलब्ध असते.  पर्यावरण दक्षता मंचच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील टीटवाला जवळ रुंदा गावात महाराष्ट्र शासनाच्या वन विभागासोबत केलेल्या करारानुसार ५० एकर परिसरात देवराई नावाचा प्रकल्प राबवित आहेत.  त्यामध्ये ११० जातींचे वृक्ष लावण्यात आली आहेत . सध्या तेथे ५० प्रकारचे पक्षी आढलतात.  भारतीय वृक्ष हे जैवविविधतेसाठी पूरक आहेत.  पाच थरांवर जंगल कार्यरत असते.  त्यामध्ये गवत,  झुडपे,  पानगाळ,  वृक्ष इत्यादी प्रकारची साखळी असल्यामुळे मोठे वृक्ष जीव धरु शकत नाहीत. ३३% वनसंपदा असलेला परिसर हा पर्यावरण दृष्ट्या अतिशय सुसह्य असतो असे जागतिक मानांकन मानले जाते.  आता वेगाने होणारे कॉक्रीट्रीकरणामुऴे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.  आपण सर्वांनी आपल्या सभोवताली वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे.  प्रा. डॉ. संजय जोशी यांनी जैवविविधतेचे महत्व विशद करतांना म्हणाले प्राणी सृष्टीमध्ये देखील विविधता असली तरी एकता आहे.  पेशीमध्ये विलक्षण साधर्म असून विविधता आहे.  राष्ट्राचे अर्थ शास्त्र वाढवायचे असेल तर जैवविविधता अधिक असल्यास राष्ट्र संपन्न समजले जाते.  जैवविविधतेचा आपण सर्व ऱ्हास करत आहोत तो आपण सर्वांनी थांबवायला हवा.  ही विनंती रसिकांना जोशी यांनी केली. पाहुण्याचे स्वागत व कार्यक्रमाचे आभार संस्थापक राजेश जाधव यांनी मानले तर पाहुण्याचा परिचय अध्यक्ष महेश जोशी यांनी केला.

टॅग्स :thaneठाणेenvironmentवातावरणEarthपृथ्वी