शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक जैवविविधता दिन : ठाण्यातील जैवविविधतेवर शासनाचाच डंख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:36 IST

धक्कादायक म्हणजे गोरेगाव-मुलुंड रस्त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ४.७ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहेत. शिवाय, एमएमआरडीएचा याच उद्यानातून ठाणे ते बोरिवलीदरम्यान केबल ट्रान्सपोर्टचा इरादा आहे.

ठाणे : सागरी-डोंगरी अन् नागरी अशा तीन विविधतांत नटलेल्या ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. संजय गांधी उद्यानाचा भाग असलेले येऊरचे जंगल, ठाणे खाडी परिसरात असलेल्या फलेमिंगो अभयारण्यासह तानसाच्या पक्षी अभयारण्याचे सौंदर्य लाभले आहे. मात्र, या सौंदर्यास वृक्षतोड करणाऱ्या माफियांसह विकासाच्या नावाखाली दस्तुरखुद्द स्थानिक स्वराज्य संस्थांसह महाराष्ट्र आणि केंद्र शासनानेच डंख मारला आहे. यामुळे या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याची गरज आहे.धक्कादायक म्हणजे गोरेगाव-मुलुंड रस्त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ४.७ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहेत. शिवाय, एमएमआरडीएचा याच उद्यानातून ठाणे ते बोरिवलीदरम्यान केबल ट्रान्सपोर्टचा इरादा आहे. तसेच ठाणे ते बोरिवलीदरम्यानचे रस्ता वाहतुकीचे अंतर कमी व्हावे, म्हणून रस्ते विकास महामंडळाने याच उद्यानातून ११ किमी लांब असा सहापदरी बोगदा खोदण्याचा निर्णय घेतला आहे. गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड मेट्रोचा सुमारे १.२ किमी मार्गही याच उद्यानातून जाणार आहे. यामुळे या उद्यानासह येऊरला धोका पोहोचून बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांवर संकट येणार आहे.ठाणे-वाशी खाडीचा परिसर फलेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला असला तरी येथूनच बुलेट ट्रेन, वाशी येथील नवा खाडीपूल आणि न्हावाशेवा सी-लिंकचे बांधकाम होत आहे. शिवाय, वॉटर ट्रान्सपोर्टसाठीदेखील तिवरांची कत्तल होत असताना तिकडे ठाणे महापालिकेनेही १३ ठिकाणी खाडीकिनारा विकासाच्या नावाखाली जैवविविधतेचा गळा घोटल्याने फलेमिंगोवर नवी जागा शोधण्याची पाळी आली आहे.जैवविविधतेने समृद्ध ठाणेसमृद्धी मार्गासह काळू, शाई, गारगाई, पिंजार धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात वृक्षकत्तल करण्यात येत असून भविष्यात आणखी ती होणार आहे. कल्याण-ठाणे-कोलशेत-गायमुख-भार्इंदर-वसई, मुंबई-नवी मुंबई-रायगड-मालवण असे प्रवासी जलवाहतुकीकरिता रो-रो सेवेचे प्रस्ताव आहेत.सद्य:स्थितीत कल्याण, वसई, मीरा-भार्इंदर, घोडबंदर रोड, भिवंडी, कोलशेत, दिवा, ठाणे, नेरूळ, बेलापूर, वाशी, गोराई, बोरिवली, वसई व भार्इंदर रो-रो वाहतूक प्रस्तावित असून त्यास केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत मान्यता मिळाली आहे.यासाठी मोठ्या प्रमाणात खारफुटी तोडून भराव सुरू आहे. ठाणे शहरातच १३ ठिकाणी वॉटरफ्रंटच्या नावाखाली निसर्गावर अत्याचार केला आहे.सध्या एमएमआरडीए क्षेत्रात बिल्डरच नव्हे त शासनाने विविध विकास प्रकल्पांद्वारे निसर्गावर घाला घातला आहे. कुठे डोंगर पोखरला जात आहे, कुठे नद्यांमध्ये भराव टाकून त्यांचे प्रवाह बदलले जात आहे. विमानतळ, सी-लिंक साठी खारफुटीची कत्तल केली जात आहे. मँग्रोज सेल शासनाच्या नियमांचे पालन करीत नाही. निसर्गाला त्याच्याप्रमाणे जगू द्या, अशी आमची मागणी आहे.- बी.एन. कुमार संचालक,नॅट कनेक्ट फ्रंट

टॅग्स :thaneठाणे