शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

कामचुकार अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:52 IST

एखादा अपवाद सोडल्यास पालिका अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचार करत नाही, असे होत नाही. त्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने वरिष्ठही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत नाही.

धीरज परब

सर्वसामान्य नागरिक आपली गाºहाणी घेऊन महापालिकेकडे मोठ्या आशेने येत असतात. बहुतांश लोकांना पालिकेच्या कारभाराची जाणीव नसते. पण पालिकेचा उंबरठा ओलांडून आपल्या न्यायासाठी येणाºया नागरिकांना जेव्हा कारवाई तर दूरच, साधे उत्तरही मिळत नाही, याचा अनुभव येतो. पालिका कार्यालय व अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या दालनांच्या खेपा मारून नागरिक थकतात. नव्हे त्यांना थकवले जाते. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. महिने आणि वर्षे झाली तरी कारवाई मात्र पालिकेकडून केलीच जात नाही. मग अशात एकतर तक्रारी करणे सोडून द्यायचे वा पालिकेचे उंबरठे घासून झाले की, मग सरकारचे उंबरठे झिजवत बसायचे. कामचुकार, भ्रष्ट व मस्तवाल अशा अनेक अधिकाºयांचा अनुभव सामान्यांना पदोपदी येत असतो. पण, नागरिकांच्या पैशांतूनच पगार घेणाºया अशा कामचुकार अधिकाºयांवर कारवाई मात्र केली जात नाही.

मीरा-भाईंदर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १२ कामचुकार अधिकाºयांवर नाममात्र का असेना दंडाची कारवाई झाली. त्यासाठी तक्रारदाराला शेवटी उपोषणाचे पत्र द्यावे लागले. आपल्या तक्रारी, समस्यांसाठी पालिकेच्या पायºया चढून थकलेल्या नागरिकांना या कारवाईतून कुठे तरी आशेचा किरण दिसू लागला असेल. पण, नाममात्र दंडाचा फारसा परिणाम होईल, असे दिसत नाही. अशा कामचुकारांना निलंबित व सेवेतून बडतर्फ करण्याची गरज आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने अशा कामचुकार अधिकाºयांविरोधात कारवाईच्या तक्रारी करण्याची व्यापक मोहीम चालवली पाहिजे.

सर्वसामान्य नागरिकांच्या अर्जावर ४५ दिवसांत कार्यवाही केली पाहिजे, असे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ७२ (क) मध्ये स्पष्ट म्हटलेले आहे. याशिवाय, नागरिकांचा जाहीरनामा आणि लोकहक्क अधिनियमही महापालिका मुख्यालयासह अन्य विभागांमध्ये लावलेला आहे. स्वत: राज्य शासनाने काढलेल्या आदेशामध्ये ८४ दिवसांत कार्यवाही करणे बंधनकारक केले आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मुख्यालयापासून अन्य कार्यालयांमध्ये नागरिक विविध तक्रारी घेऊन येत असतात. पण, दुर्दैवाने नागरिकांच्या बहुतांश तक्रारींकडे नवीन मिळालेले दुकान वा राजकीय फायदा या नजरेने पाहिले जाते. अनधिकृत बांधकामांसह विकासक आदींच्या तक्रारी म्हणजे पर्वणीच ठरते.

मीरा रोडच्या दोन सदनिकाधारकांनी केलेल्या अतिक्रमण तसेच पत्राशेडबद्दल अनेक वर्षांपासून तक्रारी करत आहेत. पण, गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाºयांनी पाठपुरावा करूनही पालिका केवळ कागदी घोडे नाचवते. बेकायदा बांधकामे करणाºयांनी न्यायालयात धाव घेतल्याने संस्थेनेसुद्धा न्यायालय गाठले. पण प्रभाग अधिकारी सतत या बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेत. तशीच स्थिती आरजीच्या जागांवर झालेल्या बेकायदा बांधकामांची तक्रार करणाºया रहिवाशांची आहे. इतर गृहनिर्माण संस्थेतील रहिवासीही अनेक वर्षांपासून इमारतीच्या आवारात झालेल्या बेकायदा बांधकामांविरोधात पालिकेपासून पोलीस आदींचे उंबरठे झिजवून दमले आहेत. असे अनेक नागरिक वर्षानुवर्षे आपल्या न्यायासाठी झगडत आहेत. काही जण शासनाकडे खेपा मारत आहेत, तर काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. पण, पालिका कारवाई करण्यास अजिबात तयार नाही. पालिकेच्या जागांवर तसेच आरक्षणांवर झालेली अतिक्रमणेही काढण्यास प्रशासन चालढकल करते.

माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यालाही महापालिकेच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराचा फटका बसला. २०१७ पासून त्याने बेकायदा बांधकामे, जाहिरात फलक, पालिकेचा महसूल बुडवणे आदींबाबत सातत्याने तक्रारी केल्या. तक्रारींवर कारवाई तर दूरच, पण साधे उत्तरही आले नाही. सततचा चालवलेला पाठपुरावा, माहिती अधिकाराचा वापर, तक्रारी व बेजबाबदार आयुक्त, अधिकाºयांवर कारवाईची मागणी आणि शेवटी उपोषणाच्या आंदोलनाचे हत्यार त्याने उपसले. नाइलाजाने का होईना आयुक्त बालाजी खतगावकर यांना बैठक बोलवावी लागली. त्या बैठकीत उत्तरे न देणाºया अधिकाºयांवर दंडाची रक्कम लावण्याचा निर्णय घ्यावा लागला. खरे तर ठोस कारवाई झाली पाहिजे.एखादा अपवाद सोडल्यास पालिका अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचार करत नाही, असे होत नाही. त्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने वरिष्ठही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत नाही. यामुळे अधिकाºयांचे चांगले फावते. अशा अधिकाºयांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना कायमचे घरी बसवणे हा जालीम उपाय आहे.प्रश्न अजूनही कायमनाममात्र ५० आणि १०० रुपये दंड लावून यंत्रणा सुधारणार नाही. पण ज्या तक्रारींवर दंड आकारला, त्यांची परिस्थिती काय? त्यावर कधी कारवाई होणार? शहरातील अशा अनेक नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे काय ? असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत.