शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

कामचुकार अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:52 IST

एखादा अपवाद सोडल्यास पालिका अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचार करत नाही, असे होत नाही. त्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने वरिष्ठही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत नाही.

धीरज परब

सर्वसामान्य नागरिक आपली गाºहाणी घेऊन महापालिकेकडे मोठ्या आशेने येत असतात. बहुतांश लोकांना पालिकेच्या कारभाराची जाणीव नसते. पण पालिकेचा उंबरठा ओलांडून आपल्या न्यायासाठी येणाºया नागरिकांना जेव्हा कारवाई तर दूरच, साधे उत्तरही मिळत नाही, याचा अनुभव येतो. पालिका कार्यालय व अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या दालनांच्या खेपा मारून नागरिक थकतात. नव्हे त्यांना थकवले जाते. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. महिने आणि वर्षे झाली तरी कारवाई मात्र पालिकेकडून केलीच जात नाही. मग अशात एकतर तक्रारी करणे सोडून द्यायचे वा पालिकेचे उंबरठे घासून झाले की, मग सरकारचे उंबरठे झिजवत बसायचे. कामचुकार, भ्रष्ट व मस्तवाल अशा अनेक अधिकाºयांचा अनुभव सामान्यांना पदोपदी येत असतो. पण, नागरिकांच्या पैशांतूनच पगार घेणाºया अशा कामचुकार अधिकाºयांवर कारवाई मात्र केली जात नाही.

मीरा-भाईंदर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १२ कामचुकार अधिकाºयांवर नाममात्र का असेना दंडाची कारवाई झाली. त्यासाठी तक्रारदाराला शेवटी उपोषणाचे पत्र द्यावे लागले. आपल्या तक्रारी, समस्यांसाठी पालिकेच्या पायºया चढून थकलेल्या नागरिकांना या कारवाईतून कुठे तरी आशेचा किरण दिसू लागला असेल. पण, नाममात्र दंडाचा फारसा परिणाम होईल, असे दिसत नाही. अशा कामचुकारांना निलंबित व सेवेतून बडतर्फ करण्याची गरज आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने अशा कामचुकार अधिकाºयांविरोधात कारवाईच्या तक्रारी करण्याची व्यापक मोहीम चालवली पाहिजे.

सर्वसामान्य नागरिकांच्या अर्जावर ४५ दिवसांत कार्यवाही केली पाहिजे, असे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ७२ (क) मध्ये स्पष्ट म्हटलेले आहे. याशिवाय, नागरिकांचा जाहीरनामा आणि लोकहक्क अधिनियमही महापालिका मुख्यालयासह अन्य विभागांमध्ये लावलेला आहे. स्वत: राज्य शासनाने काढलेल्या आदेशामध्ये ८४ दिवसांत कार्यवाही करणे बंधनकारक केले आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मुख्यालयापासून अन्य कार्यालयांमध्ये नागरिक विविध तक्रारी घेऊन येत असतात. पण, दुर्दैवाने नागरिकांच्या बहुतांश तक्रारींकडे नवीन मिळालेले दुकान वा राजकीय फायदा या नजरेने पाहिले जाते. अनधिकृत बांधकामांसह विकासक आदींच्या तक्रारी म्हणजे पर्वणीच ठरते.

मीरा रोडच्या दोन सदनिकाधारकांनी केलेल्या अतिक्रमण तसेच पत्राशेडबद्दल अनेक वर्षांपासून तक्रारी करत आहेत. पण, गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाºयांनी पाठपुरावा करूनही पालिका केवळ कागदी घोडे नाचवते. बेकायदा बांधकामे करणाºयांनी न्यायालयात धाव घेतल्याने संस्थेनेसुद्धा न्यायालय गाठले. पण प्रभाग अधिकारी सतत या बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेत. तशीच स्थिती आरजीच्या जागांवर झालेल्या बेकायदा बांधकामांची तक्रार करणाºया रहिवाशांची आहे. इतर गृहनिर्माण संस्थेतील रहिवासीही अनेक वर्षांपासून इमारतीच्या आवारात झालेल्या बेकायदा बांधकामांविरोधात पालिकेपासून पोलीस आदींचे उंबरठे झिजवून दमले आहेत. असे अनेक नागरिक वर्षानुवर्षे आपल्या न्यायासाठी झगडत आहेत. काही जण शासनाकडे खेपा मारत आहेत, तर काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. पण, पालिका कारवाई करण्यास अजिबात तयार नाही. पालिकेच्या जागांवर तसेच आरक्षणांवर झालेली अतिक्रमणेही काढण्यास प्रशासन चालढकल करते.

माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यालाही महापालिकेच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराचा फटका बसला. २०१७ पासून त्याने बेकायदा बांधकामे, जाहिरात फलक, पालिकेचा महसूल बुडवणे आदींबाबत सातत्याने तक्रारी केल्या. तक्रारींवर कारवाई तर दूरच, पण साधे उत्तरही आले नाही. सततचा चालवलेला पाठपुरावा, माहिती अधिकाराचा वापर, तक्रारी व बेजबाबदार आयुक्त, अधिकाºयांवर कारवाईची मागणी आणि शेवटी उपोषणाच्या आंदोलनाचे हत्यार त्याने उपसले. नाइलाजाने का होईना आयुक्त बालाजी खतगावकर यांना बैठक बोलवावी लागली. त्या बैठकीत उत्तरे न देणाºया अधिकाºयांवर दंडाची रक्कम लावण्याचा निर्णय घ्यावा लागला. खरे तर ठोस कारवाई झाली पाहिजे.एखादा अपवाद सोडल्यास पालिका अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचार करत नाही, असे होत नाही. त्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने वरिष्ठही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत नाही. यामुळे अधिकाºयांचे चांगले फावते. अशा अधिकाºयांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना कायमचे घरी बसवणे हा जालीम उपाय आहे.प्रश्न अजूनही कायमनाममात्र ५० आणि १०० रुपये दंड लावून यंत्रणा सुधारणार नाही. पण ज्या तक्रारींवर दंड आकारला, त्यांची परिस्थिती काय? त्यावर कधी कारवाई होणार? शहरातील अशा अनेक नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे काय ? असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत.