शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 8:39 PM

अनैतिक संबंध असलेल्या महिलेने लग्नासाठी तगादा लावल्याने तिचा खून करुन काटा काढणा-या नालासोपारा येथील अबरार शेख (३८) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमीरा युनिटने मोठया कौशल्याने सोमवारी अटक केली.

ठळक मुद्देठाणे ग्रामीणच्या गुन्हे शाखेची कामगिरीजळालेल्या कागदातून मिळाला तपासाचा दुवा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

ठाणे: अनैतिक संबंधातून निर्मला सचिन यादव (४८, रा. नालासोपारा, जि. पालघर) हिचा डोक्यात प्रहार करुन नंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणा-या अबरार शेख (३८, रा. नालासोपारा) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. कोणताही धागादोरा नसतांना अर्धवट जळालेल्या एका कागदावरील मजकूराच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.नालासोपारा येथील मराठी भाषिक निर्मलाचा मुळच्या उत्तरप्रदेशातील सचिन यादव याच्याशी विवाह झाला होता. नालासोपाºयामध्येच तिचे किराणा मालाचे दुकान आहे. याच दुकानामध्ये गेल्या काही दिवसांपासून सिगरेट खरेदीच्या निमित्ताने येणाºया अबरार याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीतून ते एकमेकांच्या ‘जवळ’ आले होते. लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्याशी अनैतिक संबंधही ठेवले होते. पुढे तिने त्याला लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र तो तिला टाळाटाळ करु लागला. १५ जानेवारी २०१९ रोजी ती काही कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी निघाली तेंव्हा त्याने तिला घोडबंदर रोडवर लग्नाची बोलणी करण्याच्या निमित्ताने घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल येथे बोलावून घेतले. तिथे आल्यानंतर तो तिला गप्पा मारण्याच्या नावाखाली २५ फूट आत जंगलात फिरायला घेऊन गेला. एका निर्जनस्थळी त्यांच्यात लग्नाच्या विषयावरुन वाद झाल्यानंतर त्याने तिच्या डोक्यावर प्रहार करुन तिचा खून केला. नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिच्याच बॅगेतील कपडयांनी आणि पाला पाचोळयाच्या सहाय्याने तिला पेटवून दिले. यात तिचा मृतदेह जळाल्यानंतर त्याने तिथून पलायन केले. १६ जानेवारी रोजी काशीमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश ढाकणे हे मुंबई अहमदाबाद मार्गावर घोडबंदर खिंड येथे गस्त घालीत असतांना जंगलात एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये पडल्याचे त्यांना एका रहिवाशाने सांगितले. ही माहिती मिळताच काशीमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करुन अज्ञात महिलेच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल केला. घटनेची गांभीर्यता पाहून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे समांतर तपासासाठी सोपविला. काशीमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि उपनिरीक्षक अभिजित टेलर, जमादार अनिल वेळे, हवालदार चंद्रकांत पोशिरकर, संदीप शिंदे, किशोर वाडीले, पोलीस नाईक अशोक पाटील, संजय शिंदे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, मनोज चव्हाण, सचिन सावंत आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेश श्रीवास्तव आदींनी घटनास्थळी मिळालेल्या एका चिठो-याच्या आधारे या महिलेच्या पतीचा शोध घेतला. त्याने अर्धवट जळालेले कपडे आणि पैंजणाच्या आधारे तो मृतदेह त्याची पत्नी निर्मलाचा असल्याचे सांगितले. त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अबरार सोबत ती तिथे आल्याचे उघड झाले. तो गुलबर्गा (कर्नाटक) येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. तत्पूर्वी, नालासोपारा येथे पत्नीला भेटण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला या पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून