शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

उल्हासनदी किनारीच्या आने गावाचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करणार- आमदार किसन कथोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:44 PM

कल्याण तालुक्यातील उल्हासनदीच्या किनारी असलेले आने गावात पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे पूराचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणात गावाचे नुकसान होत असते.

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील उल्हासनदीच्या किनारी असलेले आने गावात पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे पूराचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणात गावाचे नुकसान होत असते. या गावाचे लगतच्याच परिसरात योग्य जागी स्थलांतर करून पुनर्वसन करणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.

उल्हासनदी ही कल्याण तालुक्यातील कल्याण नगर या महामार्गावरील रायते, आने, कांबा, वरप व म्हारळ या गावा जवळून वाहत आहे. यामुळे या गावांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पूराचा फटका सहन करावा लागतो.  उल्हासनदीला थोडासा पूर आला तरी नदीचे पाणी आने गावात शिरते. यामुळे या गावातील शेतीचे, घरांचे व लोकांच्या इतर सामानाचे दरवर्षी अतोनात नुकसान होत असते. आने गावाची लोकवस्ती जवळ जवळ तीनशेहून अधिक आहे. या गावात ४५  ते ५० घरे आहेत.यावर्षी २६ ,  २७ व २८ जुलै  तसेच ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान उल्हास नदीला पूर आल्याने गावात पूराचे पाणी शिरले होते. वारंवार पावसाळ्यात पूराचे पाणी येत असल्याने नागरिक कमालीचे हतबल झाले आहेत. यंदाच्या पूर स्थितीची पाहणी करत असतांना आमदार किसन कथोरे यांनी या गावाची व्यवस्थीत पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी गावच्या स्थलांतराची मागणी कथोरे यांच्याकडे केली होती.त्यानुसार या गावाचे  स्थलांतर करण्यासाठी  किसन कथोरे यांनी महसूल प्रशासनास सूचना केल्या आहेत.  लवकरच या बाबतच्या हालचालींना वेग येणार असलयाचे समजते. पूढल्या वर्षीच्या पूराचा सामना न करावा लागणार असल्याने आने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :thaneठाणे