शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लोकसभा निवडणूक: भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे ठाणे सोडणार का? याचीच चर्चा

By अजित मांडके | Updated: June 7, 2023 05:41 IST

तसे झाले तर लोकसभेत भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत होईल.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महाविकास आघाडीत ठाण्याचा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय झाल्याने सध्याचे खासदार राजन विचारे हेच पुन्हा रिंगणात उतरतील, हे स्पष्ट आहे, पण पूर्वीचा दाखला देत ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील हा मतदारसंघ मिळावा म्हणून भाजपने जोर लावला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत कोणतीच भूमिका जाहीर केलेली नसल्याने हायकमांडकडूनच त्यांना शब्द टाकण्याची तयारीही भाजपकडून सुरू आहे. 

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. प्रकाश परांजपे यांच्यापासून राजन विचारेंपर्यंत हा गड शिवसेनेकडे राहिला. त्यापूर्वी या गडावर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी गाजवलेला हा गड शिवसेनेसोबतच्या मैत्रीत भाजपने सोडला, पण गेल्यावर्षीच्या सत्तांतरानंतर शिवसेनेतील फुटीनंतर भाजपने पुन्हा या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. 

भाजपकडून राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, ठाण्यातील आमदार संजय केळकर आणि संजीव नाईक यांची नावे चर्चेत आहेत. नाईक येथे निवडणूक लढवून विजयी झाले होते. सहस्त्रबुद्धे दीर्घकाळ स्पर्धेत असले, तरी त्यांचा जाहीर वावर कुठे दिसलेला नाही. ठाण्यात असून शिंदे यांच्या शिवसेनेला विरोध करणारे संजय केळकर यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नरेश म्हस्के वगळता अन्य कोणाचे नाव चर्चेत नाही. 

नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोन आमदारांतील वाद संपुष्टात आणणे, मिरा-भाईंदरमध्ये विद्यमान आमदार गीता जैन भाजपसोबत असल्या, तरी नरेंद्र मेहता आणि त्यांच्यात दिलजमाई घडवून आणणे हे भाजपपुढील आव्हान असेल. सध्या तरी या मतदारसंघातील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील बलाबल समान आहे, पण दोन्ही गटांपुढे अंतर्गत नाराजीचे आव्हान आहे. 

शिवाय युती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय वरून झाला असला, तरी स्थानिक पातळीवर एकत्र येण्यात अनेक आव्हाने आहेत. त्यामुळेच शिवसेना-भाजपने मतदारसंघाबाबतची संदिग्धता कायम ठेवली आहे.

ठाकरे गटाची आर्थिक कोंडी 

ठाणे लोकसभेतील तिन्ही महापालिकांत प्रशासकीय राजवट आहे. सध्या तेथे राज्य सरकारकडून म्हणजेच शिंदे-फडणवीस यांच्या सूचनेनुसारच कामे होत आहेत. तेथील ठाकरे गटाची रसद थांबली आहे. त्यामुळे विचारे यांची दिलदारी आणि उद्वव ठाकरे यांच्याबद्दल सामान्य मतदारांत असलेल्या सहानुभूतीवरच त्या पक्षाची  भिस्त आहे.

मतांचे गणित नेमके कसे असेल?

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती आणि मोदी लाटेचा फायदा विचारे यांना मिळाला. त्यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार ८२४ मते मिळाली. आता राष्ट्रवादीने माघार घेतल्याने त्याचा फायदा विचारे यांना होऊ शकतो, पण शिवसेनेतील फुटीचा, भाजप सोबत नसल्याचा फटकाही  विचारे यांना बसू शकतो.

‘...तर शिंदे नाही म्हणणार नाहीत’

 ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेल्या एकनाथ शिंदेंच्या मनात काय सुरू आहे, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यांनी अजून निर्णय दिलेला नाही. ठाणे मतदारसंघाच्या बदल्यात त्यांना कोणता मतदारसंघ हवा आहे, हेही स्पष्ट झालेले नाही. भाजपच्या ‘हायकमांड’ने आग्रह केला, तर शिंदे त्याला नाही म्हणणार नाहीत, असा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तसे झाले तर लोकसभेत भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत होईल.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा