शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

निष्काळजीपणा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 7:30 PM

खेळाचे मैदान सुरक्षित न ठेवणाºया ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाºयांविरोधात आयुक्त कारवाई का करीत नाही असा सवाल मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देनिष्काळजीपणा करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसेख्रिश्चन धर्मीयांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना निंदनीयच : संदीप पाचंगेभूखंड अन्य कोणत्याही कारणासाठी वापरला जावू नये

ठाणे: वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानासाठी असलेल्या आरक्षित भूखंडात काही दिवसांपुर्वी ख्रिश्चन धर्मीयांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना घडली होती. सदर बाब ही निंदनीयच आहे. परंतू तेवढीच चूक ही त्या जागेबाबत निष्काळजीपणा बाळगणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांची देखील आहे. या अधिकाºयांविरोधात महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार?असा सवाल मनसेने आपल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.           ठाणे शहरातील वर्तकनगर येथे खेळाचे मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडात ख्रिश्चन धर्र्मियांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे असा आरोप मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला. या घटनेत संबंधितांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या जागेचा टी.डी.आर. हिरानंदानी विकासकाला मिळाल्यामुळे खेळाचे मैदान ठा.म.पा. च्या मालकीचे आहे. त्यामुळे सदर जागेची देखभाल करणे, त्या जागेभोवती कुंपण घालून त्याची काळजी घेणे हे पालिकेच्या संबंधित अधिकाºयांचे कर्तव्य आहे. पालिका अधिकाºयांच्या या निष्काळजीपणामुळे आज दफनविधी सारखा भयंकर प्रकार घडला आहे, ज्या अधिकाºयांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे ते देखील दफनविधी करणाºया एवढेच दोषी आहेत असे पाचंगे म्हणाले. तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी ख्रिश्चन धर्मीयांना लेखी पत्राद्वारे ३० हजार चौ. फूट क्षेत्र स्मशानभूमी करीता देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यास संबंधित अधिकारी वर्ग, श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे लोकप्रतिनिधी अकार्यक्षम ठरले आहेत. सर्व धर्मीयांना अंत्यविधी करिता जागा उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. दोन्ही समाजात संघर्ष होणार नाही याची काळजी पालिका आयुक्तांनी घेऊन कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी व खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असलेला भूखंड अन्य कोणत्याही कारणासाठी वापरला जावू नये अशी मागणी मनविसेने पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेMumbaiमुंबई