शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

महापालिकेतून वगळलेल्या गावांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 06:09 IST

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार यासारख्या महापालिकांतून वगळलेल्या गावांचे नेमके काय होणार, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

मिलिंद बेल्हे, सहयाेगी संपादक

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार यासारख्या महापालिकांतून वगळलेल्या गावांचे नेमके काय होणार, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. पुणे पालिकेतून दोन गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यामुळे महामुंबई क्षेत्रातील वेगवेगळ्या पालिकांतून वगळेली गावेही आपली स्वतंत्र नगरपालिका होईल, आपल्याला नेतृत्त्व करायला मिळेल, या आशेवर आहेत. या गावांमध्ये धडाक्यात बांधकामे सुरू आहे. सध्या ग्रामपंचायती असल्याने त्या करानुसार बांधकामे करणे बिल्डरांना परवडते. पण घरे विकताना मात्र सोबतच्या शहराचा दर त्यांना मिळतो. पण ग्रामपंचायती असूनही आपल्याला हवा तसा विकास करता येत नाही, ही खदखद येथील तरूणांत आहे. सध्या तरी वगळलेली गावे ही बिल्डरांची धन होताना पाहायला मिळतात.  

सतत आकार घटणारी महापालिका म्हणून कल्याण-डोंबिवली ओळखली जाते. वगळलेली गावे पालिकेत समाविष्ट केल्यावर या पालिकेने तेथे रस्ते, दिवे, पाणी यासारख्या सुविधांवर खर्च केला. नंतर गावे परत वगळल्यावर तो खर्च पाण्यात गेला. सरकार त्याची भरपाई द्यायला तयार नाही आणि विशेष प्राधिकरण म्हणून ज्यांच्या हाती नियंत्रण आहे, ते एमएमआरडीए मोठे प्रकल्प वगळता काहीच करायला तयार नाही. 

पुण्यातील गावे पालिकेतून वगळण्यामागे राजकारण असले आणि महामुंबई क्षेत्रावर बिल्डर लॉबीचा दबाव असला तरी तो दूर करून संपूर्ण महामुंबईचा एकत्रित विकास अजूनही शक्य आहे. वगळलेल्या गावांना त्याचीच प्रतीक्षा आहे. त्यासाठी गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची. सध्या राज्याचे नेतृत्त्व ठाण्याच्या हाती आहे. त्यातून तरी विकासाचे ठाणे गाठले जाते का, यावरच येथील गावांचे, अविकसित तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

- वस्तुतः ज्या पद्धतीने मुंबईचा विकास सुरू आहे, तसाच मुंबई महानगर क्षेत्राचा व्हावा म्हणून तेथील पालिकांप्रमाणे या भागाच्या विकास आराखड्याचे स्वप्न दाखवले गेले. - येथील सर्व पालिकांत आयएएस अधिकारी नेमून एकजिनसी विकासाचे स्वप्न दाखवले गेले. पण प्रकल्प मार्गी लावण्याखेरीज त्यातून काही साध्य झाले नाही.- वर्षानुवर्षे विशिष्ट दोन-तीन पक्षांच्या हाती सत्ता असूनही पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, घनकचरा, सांडपाण्यावरील प्रक्रिया, आरोग्य यातील एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही.