शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

चिखलोली धरणातून पाणीपुरवठा झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:04 IST

वाटपात होणार बदल : एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी उचलणार, तळ गाठल्याने शुद्धीकरणात अडचणी

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या धरणातील पाणी उचलण्याचे काम बंद करण्यात आले आहे. धरणातील पाणी उचलणे बंद झाल्याने त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी उचलण्याचे काम जीवन प्राधिकरणाने सुरू केले आहे. त्यामुळे पाण्याच्या वाटपात काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे.चिखलोली धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने या धरणातील पाणी शुद्ध करण्यात अडचणी येत आहेत. पाणी शुद्धीकरण यंत्रणा अपुरी पडत असल्याने पूर्व भागात दूषित पाणीपुरवठा होत होता. धरणातील पाणी हे मातीमिश्रित येत असल्याने आता या धरणातील पाणी उचलण्याचे काम बंद केले आहे. त्यातच, धरणाच्या ठिकाणी काम सुरू असल्याने त्या कामातही अडथळा निर्माण होत होता. अखेर, जीवन प्राधिकरणाने चिखलोली धरणातून होणारे सहा दशलक्ष लीटर एवढे पाणी थेट धरणातून न उचलता एमआयडीसीकडून उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

चिखलोलीचे पाणी बंद झाल्याने आता एमआयडीसीने पूर्वीचे १० आणि चिखलोली धरणाच्या पाण्याच्या कमतरतेमुळे अतिरिक्त सहा दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणार असल्याने आता गुरुवार ते शनिवारपर्यंत पाणीवितरणात काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. हे तीन दिवस नागरिकांना त्रासाचे जाणार आहे. उर्वरित दिवशी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे. अंबरनाथ पूर्वेला या धरणातून पाणीपुरवठा होतो. मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई जाणऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.

पाणीसमस्येवर विशेष बैठकीची मागणीबदलापूरमध्ये काही महिन्यांपासून पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी यासंदर्भात चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी विशेष सभा बोलवण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केली आहे. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून प्रियेश जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसºयाच दिवशी ही मागणी करण्यात आली आहे. सध्या बदलापूरमध्ये पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे. निवडणूक काळातही यामुळे लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. आचारसंहितेमुळे काही बंधने असल्याने याबाबत निर्णय घेता येत नव्हते. परंतु, आता निवडणूक झाली असल्याने काही महत्त्वपूर्ण बाबींसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरणbadlapurबदलापूर