शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बातरेपाडा रावतेपाड्यात नदीपात्रात खड्डा खोदून मिळते घोटभर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:59 IST

भिंवडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या बातरेपाडा, रावतेपाडा आणि हारेपाड्यातील आदिवासी - कातकरी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव - भिंवडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या बातरेपाडा, रावतेपाडा आणि हारेपाड्यातील आदिवासी - कातकरी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिला हंडाभर पाण्यासाठी गावाबाहेरील नदी पात्रात खड्डा खोदून दूषित पाणी घेऊन येतात. दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या तीव्र पाणी टंचाईकडे भिवंडी पंचायत समिती पाणी पूरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो आहे. दरम्यान, पाणी टंचाईबाबत वारंवार सांगूनही याप्रकरणी काहीही उपाय न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अभियंत्यांना घेराव घातला.बातरेपाडा, रावते पाडा, हारेपाडा येथील परिसरातील महिला नदीत खड्डा खोदून जिथे ओहोळ दिसेल तिथे पाणी गोळा करतात. पाणी दूषित आहे हे दिसत असूनही स्वत:सह मुलाबाळांना देखील तेच पाणी देतात. या भागातील बोरवेलचे पाणी देखील दूषित आहे. खूप प्रयत्न करून हंडाभर पाणी मिळाले तरी ते पिवळे असते. भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यामध्ये पाणी टंचाई असल्याचे लेखी निवेदन पाणीपुरवठा उपअभियंता ए. जी. राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्करराव यांना सहा महिन्यांपूर्वी दिलेले आहे. असे असतानाही पाणीपुरवठा विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील आदिवासींना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. या पाड्यामधील टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करतानाही दिसत नाही. या तीनही पाड्यात पाणी टंचाई असल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे केलेल्या आहेत. महिनाभरापूर्वी पाण्यासाठी महिलांची भांडणे झाली, त्याबाबत पडघा पोलिसांत तक्र ार दाखल झाली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती मैदे गावातील सुरेखा पाटील यांनी दिली.येथील आदिवासींना खड्ड्यातील पाणी प्यावे लागत असून येथील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष का देत नाहीत? निवडणुकीत मते मागतात, विकास करण्याची आश्वासने देतात. यांना आमच्या समस्या दिसत नाहीत काय, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.या पाड्यात दरवर्षी पाणी टंचाई होते. ती दूर करण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. येथे तात्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. - आशा भोईर, संघटक, श्रमजीवी संघटना, भिंवडी तालुकाया पाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- भुºया गव्हाले, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मैदे

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळthaneठाणे