शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बातरेपाडा रावतेपाड्यात नदीपात्रात खड्डा खोदून मिळते घोटभर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:59 IST

भिंवडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या बातरेपाडा, रावतेपाडा आणि हारेपाड्यातील आदिवासी - कातकरी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव - भिंवडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या बातरेपाडा, रावतेपाडा आणि हारेपाड्यातील आदिवासी - कातकरी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिला हंडाभर पाण्यासाठी गावाबाहेरील नदी पात्रात खड्डा खोदून दूषित पाणी घेऊन येतात. दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या तीव्र पाणी टंचाईकडे भिवंडी पंचायत समिती पाणी पूरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो आहे. दरम्यान, पाणी टंचाईबाबत वारंवार सांगूनही याप्रकरणी काहीही उपाय न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अभियंत्यांना घेराव घातला.बातरेपाडा, रावते पाडा, हारेपाडा येथील परिसरातील महिला नदीत खड्डा खोदून जिथे ओहोळ दिसेल तिथे पाणी गोळा करतात. पाणी दूषित आहे हे दिसत असूनही स्वत:सह मुलाबाळांना देखील तेच पाणी देतात. या भागातील बोरवेलचे पाणी देखील दूषित आहे. खूप प्रयत्न करून हंडाभर पाणी मिळाले तरी ते पिवळे असते. भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यामध्ये पाणी टंचाई असल्याचे लेखी निवेदन पाणीपुरवठा उपअभियंता ए. जी. राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्करराव यांना सहा महिन्यांपूर्वी दिलेले आहे. असे असतानाही पाणीपुरवठा विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील आदिवासींना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. या पाड्यामधील टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करतानाही दिसत नाही. या तीनही पाड्यात पाणी टंचाई असल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे केलेल्या आहेत. महिनाभरापूर्वी पाण्यासाठी महिलांची भांडणे झाली, त्याबाबत पडघा पोलिसांत तक्र ार दाखल झाली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती मैदे गावातील सुरेखा पाटील यांनी दिली.येथील आदिवासींना खड्ड्यातील पाणी प्यावे लागत असून येथील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष का देत नाहीत? निवडणुकीत मते मागतात, विकास करण्याची आश्वासने देतात. यांना आमच्या समस्या दिसत नाहीत काय, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.या पाड्यात दरवर्षी पाणी टंचाई होते. ती दूर करण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. येथे तात्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. - आशा भोईर, संघटक, श्रमजीवी संघटना, भिंवडी तालुकाया पाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- भुºया गव्हाले, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मैदे

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळthaneठाणे