शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

उल्हासनगरातील अवैध बांधकामाला प्रभाग अधिकारी जबाबदार, आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 21:09 IST

Ulhasnagar : उल्हासनगर अवैध बांधकामाचे शहर म्हणून प्रसिद्ध असून अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, राज्य शासनाने सन २००५ मध्ये बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : अवैध बांधकामावरून आरोप प्रत्यारोप होत असताना आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी नियंत्रक अनाधिकृत बांधकाम निष्कासन पद रद्द करून, अवैध बांधकामाला प्रभाग अधिकारी जबाबदार असल्याचा आदेश काढला आहे. प्रभाग अधिकारी हे संबंधित उपयुक्तांना माहिती दिल्यावर, उपायुक्त अतिरिक्त आयुक्त मार्फत आयुक्तांना माहिती देणार आहे. 

उल्हासनगर अवैध बांधकामाचे शहर म्हणून प्रसिद्ध असून अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, राज्य शासनाने सन २००५ मध्ये बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला. अध्यादेशात अवैध बांधकामाला आळा घालण्याचे सुचविले होते. मात्र अवैध बांधकामे सुरूच राहिल्याचा आरोप सर्वस्तरातून होत आहे. भूमाफियांनी आपला मोर्चा खुले भूखंड, महापालिका शाळा, मैदाने, उद्याने, खुल्या जागेवर वळविल्याचे उघड झाले. 

प्रत्यक्ष अप्रत्यक्ष महापालिका अधिकाऱ्यांसह राजकीय नेते, स्थानिक नगरसेवक यामध्ये सहभागी असल्याची चर्चाही शहरात रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालय समोर ८० वर्षाचे एक नागरिक उपोषणाला बसले असून दुसऱ्या एका नागरिकाने जमिनीत अर्ध गाळून उपोषणाचा इशारा दिला आहे. 

शहरात सर्वत्र अवैध बांधकामाचा आरोप व जेष्ठ नागरिक उपोषणाला बसल्याची दखल आयुक्तांनी घेतली. बुधवारी १६ डिसेंबर रोजी आयुक्त दयानिधी यांनी आदेश काढून नियंत्रक अनाधिकृत बांधकाम निष्काषन पद रद्द केले. तसेच अवैध बांधकामाला प्रभाग अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. अवैध बांधकामाचा अहवाल प्रभाग अधिकारी संबंधित उपायुक्त यांना सादर करणार आहेत. सदर अहवाल उपायुक्त हे अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून आयुक्तांना सादर करणार आहेत. आयुक्तांच्या या आदेशाने अवैध बांधकाम ठेकेदार व संबंधितांचे दाबे दणाणले आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी होणार का? असा प्रश्न राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना पडला. 

महापालिका शाळेच्या अतिक्रमाचे झाले काय?महापालिका शाळा इमारत तोडून त्याजागी अतिक्रमण करण्यात आले. तसेच विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जवळील एका हॉटेलच्या शेजारील महापालिका पार्किंगच्या भूखंडाच्या अतिक्रमण तक्रार एका लोकप्रतिनिधींने करून महापालिकेने काय कारवाई केली?. इतर अवैध बांधकामावर कारवाई का नाही? असे अनेक प्रश्न राजकीय नेत्यांनी उपस्थित केले आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर