शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

उल्हासनगरातील अवैध बांधकामाला प्रभाग अधिकारी जबाबदार, आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 21:09 IST

Ulhasnagar : उल्हासनगर अवैध बांधकामाचे शहर म्हणून प्रसिद्ध असून अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, राज्य शासनाने सन २००५ मध्ये बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : अवैध बांधकामावरून आरोप प्रत्यारोप होत असताना आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी नियंत्रक अनाधिकृत बांधकाम निष्कासन पद रद्द करून, अवैध बांधकामाला प्रभाग अधिकारी जबाबदार असल्याचा आदेश काढला आहे. प्रभाग अधिकारी हे संबंधित उपयुक्तांना माहिती दिल्यावर, उपायुक्त अतिरिक्त आयुक्त मार्फत आयुक्तांना माहिती देणार आहे. 

उल्हासनगर अवैध बांधकामाचे शहर म्हणून प्रसिद्ध असून अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, राज्य शासनाने सन २००५ मध्ये बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला. अध्यादेशात अवैध बांधकामाला आळा घालण्याचे सुचविले होते. मात्र अवैध बांधकामे सुरूच राहिल्याचा आरोप सर्वस्तरातून होत आहे. भूमाफियांनी आपला मोर्चा खुले भूखंड, महापालिका शाळा, मैदाने, उद्याने, खुल्या जागेवर वळविल्याचे उघड झाले. 

प्रत्यक्ष अप्रत्यक्ष महापालिका अधिकाऱ्यांसह राजकीय नेते, स्थानिक नगरसेवक यामध्ये सहभागी असल्याची चर्चाही शहरात रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालय समोर ८० वर्षाचे एक नागरिक उपोषणाला बसले असून दुसऱ्या एका नागरिकाने जमिनीत अर्ध गाळून उपोषणाचा इशारा दिला आहे. 

शहरात सर्वत्र अवैध बांधकामाचा आरोप व जेष्ठ नागरिक उपोषणाला बसल्याची दखल आयुक्तांनी घेतली. बुधवारी १६ डिसेंबर रोजी आयुक्त दयानिधी यांनी आदेश काढून नियंत्रक अनाधिकृत बांधकाम निष्काषन पद रद्द केले. तसेच अवैध बांधकामाला प्रभाग अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. अवैध बांधकामाचा अहवाल प्रभाग अधिकारी संबंधित उपायुक्त यांना सादर करणार आहेत. सदर अहवाल उपायुक्त हे अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून आयुक्तांना सादर करणार आहेत. आयुक्तांच्या या आदेशाने अवैध बांधकाम ठेकेदार व संबंधितांचे दाबे दणाणले आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी होणार का? असा प्रश्न राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना पडला. 

महापालिका शाळेच्या अतिक्रमाचे झाले काय?महापालिका शाळा इमारत तोडून त्याजागी अतिक्रमण करण्यात आले. तसेच विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जवळील एका हॉटेलच्या शेजारील महापालिका पार्किंगच्या भूखंडाच्या अतिक्रमण तक्रार एका लोकप्रतिनिधींने करून महापालिकेने काय कारवाई केली?. इतर अवैध बांधकामावर कारवाई का नाही? असे अनेक प्रश्न राजकीय नेत्यांनी उपस्थित केले आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर