शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Vidhan sabha 2019 : निवडणूक कामासाठी पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 01:49 IST

निवडणूक कामासाठी अद्याप पाच हजार कर्मचारी कमी पडत असून, ही गरज भागवताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : विधानसभा निवडणूक कामासाठी ठाणे जिल्ह्यात ५४ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. सरकारी व निमसरकारी कर्मचा-यांसह विनाअनुदानीत शाळांचे १३ हजार ५०० कर्मचारी मिळून ही गरज भागवणे शक्य आहे. मात्र या शाळांनी न्यायालयात धाव घेऊन निवडणूक कामास नकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक कामासाठी कर्मचा-यांची उणीव भासण्याची शक्यता आहे. अद्याप पाच हजार कर्मचारी कमी पडत असून, ही गरज भागवताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी जवळपास सात हजार बूथ तयार केले आहेत. या प्रत्येक बूथवर कमीत कमी पाच कर्मचा-यांसह एका शिपायाची आवश्यकता आहे. या ३५ हजार आवश्यक कर्मचा-यांच्या गरजेसाठी १२५ टक्के कर्मचारी पहिल्या प्रशिक्षणासाठी लागतात.या सुमारे ४२ हजार कर्मचा-यांसह बीएलओ म्हणून सात हजार कर्मचारी आणि १८ विधानसभा मतदारसंघांच्या आरओ आॅफिससाठी लागणारे पाच हजार कर्मचारी अशा ५४ हजार कर्मचा-यांची जुळवाजुळव जिल्हा प्रशासनास या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी करावी लागत आहेत. त्यासाठी प्रशासनाची पुरती दमछाक सुरू आहे.जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांसह शासकीय, तसेच खासगी शाळा आणि विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षक व कर्मचारी मिळून ५४ हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी तैनात होणे शक्य आहे.पण विनाअनुदानीत शाळांनी या कामास नकार देत न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्या बाजून निकाला लागला. यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध कर्मचारी संख्येतून तब्बल १३ हजार ५०० विनाअनुदानीत शाळांचे कर्मचारी कमी झाल्यामुळे निवडणूक कामासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाची दमछाक होत आहे.या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातून दहा हजार कर्मचारी उपलब्ध केले आहेत. मात्र तरीदेखील पाच हजार कर्मचाºयांची कमतरता असून, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास कारवाईजिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सात हजार बूथ निर्माण करण्यात आले आहेत. त्यासाठी राखीव कर्मचाºयांसह एकूण १२५ टक्के कर्मचाºयांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले. आता दुसºया टप्प्याच्या प्रशिक्षणासाठी यामधील ११० टक्के कर्मचाºयांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. यासाठी ३९ हजार कर्मचाºयांची गरज आहे. यासाठी निवड झालेल्या कर्मचाºयांनी प्रशिक्षणास उपस्थित राहण्याची गरज आहे. या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचाºयांवर त्वरित कारवाई करण्याचे संकेत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. या राष्ट्रीय कार्यात प्रामाणिक काम करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे या कामासाठी कर्मचारी वर्गाने गैरहजर न राहता उत्स्फूर्तपणे काम करण्याचे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे