शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : निवडणूक कामासाठी पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 01:49 IST

निवडणूक कामासाठी अद्याप पाच हजार कर्मचारी कमी पडत असून, ही गरज भागवताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : विधानसभा निवडणूक कामासाठी ठाणे जिल्ह्यात ५४ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. सरकारी व निमसरकारी कर्मचा-यांसह विनाअनुदानीत शाळांचे १३ हजार ५०० कर्मचारी मिळून ही गरज भागवणे शक्य आहे. मात्र या शाळांनी न्यायालयात धाव घेऊन निवडणूक कामास नकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक कामासाठी कर्मचा-यांची उणीव भासण्याची शक्यता आहे. अद्याप पाच हजार कर्मचारी कमी पडत असून, ही गरज भागवताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी जवळपास सात हजार बूथ तयार केले आहेत. या प्रत्येक बूथवर कमीत कमी पाच कर्मचा-यांसह एका शिपायाची आवश्यकता आहे. या ३५ हजार आवश्यक कर्मचा-यांच्या गरजेसाठी १२५ टक्के कर्मचारी पहिल्या प्रशिक्षणासाठी लागतात.या सुमारे ४२ हजार कर्मचा-यांसह बीएलओ म्हणून सात हजार कर्मचारी आणि १८ विधानसभा मतदारसंघांच्या आरओ आॅफिससाठी लागणारे पाच हजार कर्मचारी अशा ५४ हजार कर्मचा-यांची जुळवाजुळव जिल्हा प्रशासनास या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी करावी लागत आहेत. त्यासाठी प्रशासनाची पुरती दमछाक सुरू आहे.जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांसह शासकीय, तसेच खासगी शाळा आणि विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षक व कर्मचारी मिळून ५४ हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी तैनात होणे शक्य आहे.पण विनाअनुदानीत शाळांनी या कामास नकार देत न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्या बाजून निकाला लागला. यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध कर्मचारी संख्येतून तब्बल १३ हजार ५०० विनाअनुदानीत शाळांचे कर्मचारी कमी झाल्यामुळे निवडणूक कामासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाची दमछाक होत आहे.या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातून दहा हजार कर्मचारी उपलब्ध केले आहेत. मात्र तरीदेखील पाच हजार कर्मचाºयांची कमतरता असून, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास कारवाईजिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सात हजार बूथ निर्माण करण्यात आले आहेत. त्यासाठी राखीव कर्मचाºयांसह एकूण १२५ टक्के कर्मचाºयांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले. आता दुसºया टप्प्याच्या प्रशिक्षणासाठी यामधील ११० टक्के कर्मचाºयांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. यासाठी ३९ हजार कर्मचाºयांची गरज आहे. यासाठी निवड झालेल्या कर्मचाºयांनी प्रशिक्षणास उपस्थित राहण्याची गरज आहे. या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचाºयांवर त्वरित कारवाई करण्याचे संकेत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. या राष्ट्रीय कार्यात प्रामाणिक काम करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे या कामासाठी कर्मचारी वर्गाने गैरहजर न राहता उत्स्फूर्तपणे काम करण्याचे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे