शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा बळी , घोडबंदर मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:15 IST

घणसोली येथे राहणाऱ्या कुटुंबाचा घोडबंदर मार्गावर अपघात होऊन चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडली आहे.

नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या कुटुंबाचा घोडबंदर मार्गावर अपघात होऊन चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडली आहे.रस्त्याच्या काँक्रीटीकरणावेळी तयार झालेल्या फटीमुळे हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमुळे सदर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.घणसोली सिम्प्लेक्स येथील माउलीकृपा सोसायटीत राहणाºया विक्रांत दास यांच्यासोबत ही दुर्घटना घडली आहे. ते पत्नी अंजू व अडीच वर्षांचा मुलगा वेदांत यांच्यासोबत मोटारसायकलवरून बोरीवलीच्या दिशेने चालले होते. विक्रांत यांची बहीण त्याठिकाणी राहत असून, रक्षाबंधनासाठी ते तिच्याकडे चालले होते. घोडबंदर मार्गावरील वेदांत रुग्णालयासमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. रस्त्याच्या काँक्रीटीकरणावेळी तयार झालेल्या फटीमध्ये दुचाकीचा टायर अडकून अपघात झाल्याचे विक्रांत दास यांनी सांगितले. या वेळी तिघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये मुलगा वेदांत याचा मृत्यू झाला. तर पत्नी अंजू गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू असून शनिवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दुर्घटनेमुळे दास कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर रस्त्यावरील खड्ड्यामुळे घडलेल्या या घटनेप्रकरणी संबंधितावर कारवाईची मागणीही होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे