शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

ठाण्यात परांजपे विरुद्ध विचारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:07 AM

राष्ट्रवादी काँग्रेससाठी तारेवरची कसरत

ठाणे : लोकशाही आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचे नाव घोषित झाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या निवडणुकीत रंगणार आहे. यावेळी लोकशाही आघाडीचाच उमेदवार बाजी मारेल, असा दावा राष्ट्रवादीने केला असून मागील निवडणुकीच्या तुलनेत दुपटीने मते मिळतील, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात कोणाला किती मते द्यायची, हे मतदारराजाच निश्चित करणार आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून हा बालेकिल्ला हिरावून घेण्यात राष्टÑवादीला यश आले होते; परंतु हे यश त्यांना जास्त काळ टिकवता आले नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे संजीव नाईक विरुद्ध शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात सामना रंगला होता. त्यावेळी मोदीलाटेत विचारे यांनी शिवसेनेचा गड पुन्हा आपल्याकडे खेचून घेतला. २०१९ मध्ये राष्टÑवादीकडून नाईक कुटुंबातीलच व्यक्तीच निवडणूक लढवेल, अशी अपेक्षा होती; परंतु नाईक कुटुंबाने निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवल्याने राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. राजन विचारे हे विद्यमान खासदार असून, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. परांजपे हे ठाण्यात वास्तव्यास असले, तरी त्यांच्यासाठी हा मतदारसंघ तसा नवाच आहे.ऐनवेळी त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आल्याने त्यांना संपूर्ण मतदारसंघापर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नाईक कुटुंबातील एखादा उमेदवार असता, तर कदाचित येथे चुरशीची लढत झाली असती, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या कामांची पोचपावती सुज्ञ मतदार देईल, असा विश्वास खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, या निवडणुकीत २००९ ची पुनरावृत्ती राष्टÑवादी करेल, असा दावा आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी केला आहे.ठाणे हा शिवसेनेचा गड राहिला आहे. मागील निवडणुकीत या पक्षाने दोन लाख ८५ हजार मतांनी सरशी मिळवली होती. यावेळी ती दुप्पट असेल. मतदारांना माहीत आहे, पाच वर्षांत कुणी काम केले आणि कुणी नाही केले. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होणार आहे.- राजन विचारे,खासदार, शिवसेनापक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जिल्ह्यातील ज्येष्ठांनी विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत २००९ ची पुनरावृत्ती होईल आणि आघाडीचा विजय होईल.- आनंद परांजपे, राष्टÑवादीशिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी, सेनेला भाजपाची आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची कितपत मदत होते, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी, सेनेला भाजपाची आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची कितपत मदत होते, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस