शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वाजपेयींच्या कविता मार्गदर्शक- राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:06 AM

सर्वपक्षीय श्रद्धांजली, कवितांमधून जीवनाकडे पाहण्यास शिकवले

ठाणे : भारतरत्न तथा माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी केवळ विचारांमधूनच नाहीतर, आपल्या कवितांमधून देशाकडे आणि जीवनाकडे पाहण्यास शिकवले, असे उद्गार काढत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी अटलजी यांच्या कवितासंग्रहातील निवडक कविता गायिका पद्मजा फेणाणी यांनी सादर करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.नेता म्हणून आपल्यासमोर कसे व्यक्तिमत्त्व हवे, तर ते अटलजींसारखे हवे, असे बोलत देशाप्रति नागरिकांची भक्ती कशी असावी, हे त्यांनी कवितांमधून दाखवून दिले. त्यांच्या कविता पुढील पिढीलाही मार्गदर्शक ठरतील. डोंबिवली आणि अटलजींचे एक आगळेवेगळे नाते असल्याने ते विविध कार्यक्रमांसाठी डोंबिवलीत येत. त्यामुळेच त्यांचे विचार कार्यकर्त्यांना लाभल्याचे चव्हाण यांनी सांगितले. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहताना, शब्दच अपुरे पडले असते, यामुळे त्यांच्या कवितांमधूनच त्यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, रवींद्र फाटक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत चव्हाण, रवी मोरे यासह नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा