शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाने प्रवासात फिजिकल डिस्टंसिंगसाठी शाळांच्या बसचा वापर करावा - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 11:55 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी राज्यसभेत कोरोना कसा रोखता येईल यासंदर्भात विचार मांडले. त्यावेळी त्यानी ठाणे जिल्हा त्यातही कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट असल्याची चिंता व्यक्त केली.

डोंबिवली  - राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, राज्य शासनाने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी, पण तसे होताना दिसत नाही ही खंत आहे. कम्युनिटी स्प्रेड वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु त्या बदल्यात राज्य शासनाने रस्ते वाहतूक अधिकाधिक सक्षम करावी, डोंबिवली ते मुंबई प्रवासात 7 तास लागत असल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. बसमध्ये फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही, हे योग्य नसून बस प्रवासात गर्दी वाढू नये यासाठी अधिक वाहने विशिष्ट वेळाने सोडण्यात यावी, त्यासाठी गरज पडल्यास शाळांच्या बस बंद आहेत त्या रस्त्यावर आणावे असे आवाहन राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी राज्यसभेत कोरोना कसा रोखता येईल यासंदर्भात विचार मांडले. त्यावेळी त्यानी ठाणे जिल्हा त्यातही कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट असल्याची चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, केंद्र सरकार अतिशय गंभीर असून अद्याप लोकल सेवा त्यासाठीच सुरू केलेली नाही. पण रस्ते वाहतुकीला प्राधान्य दिले आहे, असे असतानाही ठाणे जिल्ह्यात मात्र डोंबिवली ते मुंबई प्रवासाला 7 तास लागत आहेत ही गंभीर बाब असल्याचे म्हटले. रस्त्यांची दुर्दशा झाली असून राज्य शासनाने त्याची दखल घ्यायला हवी आणि रस्ते वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. कोरोना रोखण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करायला हवी, पण तसे होत नसल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याने चिंता व्यक्त केली.

बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय कोरोना परिषदेत देखील प्रवासात कल्याण डोंबिवलीकरांचे जे हाल होत असल्याबद्दल आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, राजेश कदम, इरफान शेख, बाबा रामटेके आदींनी जाहीर नाराजी व्यक्त केली. डोंबिवलीत इंदिरा गांधी चौकात सकाळी बस पकडण्यासाठी नोकरदारांचे 3 किमी रांगा लागत आहेत हे वास्तव मनपा, सत्ताधारी का लपवत आहेत. सातत्याने त्या गर्दीबद्दल आवाज उठवला जात आहे, ती गर्दी विभागण्यासाठी पूर्वेला बस उभे करण्यासाठी 6 स्पॉट असावेत, ते कुठले असावेत याची माहिती आयुक्तांना, पालकममंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्याचे चव्हाण म्हणाले. पश्चिमेला देखील बस सोडाव्यात असेही सांगितले होते, परंतु त्याचे पालन केले गेले नाही ही वस्तुस्थिती असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

कल्याण शीळ रस्त्याचे काम लॉकडाऊनच्या काळात झपाट्याने व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही. जागोजागी खड्डे आहेत, पत्रिपुलावरील खड्डे कसे भरले जात होते त्याचा व्हिडिओ व्हायरल करावा लागला तेव्हा कुठं राज्य शासन जाग झालं आणि 24 तासाच्या आत डांबरीकरण करून खड्डे बुजवले गेल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली. म्हणजेच मागे लागलं की बदल होणार असतील तर त्या दृष्टीने या पुढे काम हाती घ्यावी लागतील असा टोला यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत देशात तब्बल 97,894 नवे रुग्ण, रुग्णसंख्येने ओलांडला 51 लाखांचा टप्पा 

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...

"केंद्र सरकार वादे आणि दावे करतंय पण कोरोना पुढे, देश मागे हेच 'वास्तव'; जनतेला सोसावे लागताहेत चटके"

टॅग्स :dombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस