शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:12 IST

करिअरमुळे इंग्रजीला अधिक महत्त्व : शब्द, व्याकरण समजणे जाते कठीण, शिक्षकांनी व्यक्त केली मते

- जान्हवी मौर्ये डोंबिवली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १४ सप्टेंबरला हिंदी दिनाचे औचित्य साधून ‘एक राष्ट्र एक भाषा’ याचे समर्थन केले होते. हिंदी भाषा देशाला एकसंध बांधून ठेवू शकते. परंतु, देशाचे भावी नागरिक असलेला युवा वर्ग आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिक्षण घेत आहे. इंग्रजी ही त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाची भाषा झाली आहे. त्यामुळे हिंदीचा अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी असून त्यांना या भाषेचे वावडे असल्याचे पाहायला मिळत आहे.चंद्रकांत पाटकर विद्यालयातील हिंदी विषयाच्या शिक्षिका कविता राऊत म्हणाल्या, मुले हिंदी भाषेत एकमेकांशी संवाद साधतात, चित्रपट पाहतात. पण, इतर विषयांपेक्षा हिंदी विषयात कमी गुण मिळतात. हिंदीच्या तुलनेत इतर विषयांत गुण चांगले मिळतात. हिंदी भाषा बोलणे आणि अभ्यास करणे यात फरक पडतो. शुद्ध भाषा त्यांना फार कमी ऐकायला मिळते. जे ऐकतात, तेच लिहितात. त्यामुळे त्यांचे गुण कमी होतात. विद्यार्थ्यांना करिअरसाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची वाटते. त्यामुळे विद्यार्थी त्या विषयाला अधिक प्राधान्य देतात. हिंदीत जेवढे साहित्य उपलब्ध व्हायला हवे, ते होत नाही. अभियांत्रिकीचा अभ्यास इंग्रजीत आहे. त्यासाठी हिंदी किंवा मातृभाषेत साहित्य नाही. हे साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थी त्याकडे वळतील. हिंदी भाषाही रोजगार देऊ शकते. मात्र, त्या अंगाने त्याकडे पाहिले जात नाही. हिंदी भाषेत करिअर करण्यासाठी संधी कमी उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी भाषेच्या कारणांमुळे मागे पडत आहे.पाटकर शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता तावडे म्हणाल्या, हिंदी भाषेचे महत्त्व मुलांना पटवून दिले नाही. हिंदीची शुद्ध भाषा कोणाला येत नाही. हिंदी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. चित्रपटातील हिंदी मुलांना चांगली येते. परदेशी भाषेचे फॅड आले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा त्यांना मिळत असल्याने मुले त्या भाषांकडे वळतात. इयत्ता आठवीनंतर विद्यार्थी हिंदी भाषेकडे कमी वळतात. हिंदीची आवड असणारेच हिंदी घेतात. आपल्याकडे ३०० भाषा आहेत. त्यामुळे हिंदी राष्ट्रभाषा झाली पाहिजे. मुंबईत सर्व भाषिक एकत्र आले तरी त्यांच्याकडून जास्तीतजास्त हिंदी बोलली जाते. डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थी आरमन कपास म्हणाला, हिंदीत काना, मात्रा, वेलांटी असल्यामुळे मला शब्द नीट समजत नाहीत. त्यामुळे हिंदीचा अभ्यास करायला मला आवडत नाही. तर, मंथन सालियन याने सांगितले, हिंदी विषयाचा अभ्यास करायला मलाही कंटाळा येतो. त्यापेक्षा इंग्रजी विषय चांगला वाटतो. करिअरच्या दृष्टीने हिंदीला फारसा स्कोप नाही. ब्लॉसम स्कूलमधील विद्यार्थी अथर्व वाघ म्हणाला, हिंदीचे शुद्धलेखन समजत नाही. वर्णमाला आधी शिकलो आहे, तेव्हा पण शिक्षक जलदगतीने शिकवत असल्याने आता ही हिंदीचा विषय परिपक्व झाला नाही. गार्डियन स्कूलमधील श्रेया सडेकर यांच्या मते, हिंदीतील शब्दांचे अर्थ समजायला कठीण जातात. हिंदीचे वाचन फारसे होत नाही. त्यामुळे लिहितानाही त्रास होतो.साहित्य कधी वाचणार?पालक प्राजक्ता सडेकर म्हणाल्या, शाळेकडून हिंदीपेक्षा इंग्रजी विषयाकडे जास्त भर दिला जातो. आमच्या काळात विविध स्पर्धा होत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण होत होती. आता तसे होत नाही. मुले आताच शालेय पातळीवर हिंदी वाचत नाही तर साहित्याचा अभ्यास कधी करणार.

टॅग्स :hindiहिंदीSchoolशाळाStudentविद्यार्थी