शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनातील फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांचेठाणे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 5:52 PM

जिल्हाधिकरी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. समृध्दी महामार्गातील भ्रष्टाचाराच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोरी व फसवणूक बाधित शेतकऱ्यांवर बेकायदेशीर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधात, जिल्ह्यातील समृध्दीत बाधीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे येथील शेतकऱ्यांकडून नमुद करण्यात आले. या उपोषणाची त्वरीत दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. यावेळी या उपोषणकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनी देखील भेट दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करीत भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरीशेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोरीवेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाकडून न्याय मिळालेला नाही

ठाणे : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्यां जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करीत भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. समृध्दी महामार्गातील भ्रष्टाचाराच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोरी व फसवणूक बाधित शेतकऱ्यांवर बेकायदेशीर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधात, जिल्ह्यातील समृध्दीत बाधीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे येथील शेतकऱ्यांकडून नमुद करण्यात आले. या उपोषणाची त्वरीत दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. यावेळी या उपोषणकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनी देखील भेट दिली. या व्यासपीठावर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह फसवणूक झालेले शेतकरी व समाजकार्यकर्त्यांनी देखील या उपोषणात सहभाग घेतला आहे.शेतकरख़यांची फसवणूक झाल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाकडून न्याय मिळालेला नाही. मात्र संंबंधीत अधिकाऱ्यांच्या दलालांकडून मानिसक, शारीरिक आणि अर्थीक छळूक सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संबंधीत शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यचे या उपोषणकर्त्यांमधील भिवंडी येथील कैलास ढमणे यांनी सांगितले. आमच्या ढमणे परिवारासह जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कल्याण येथील फसवणूक झालेले शेतकरी देखील या बेमुदत उपोषणात सहभागी असल्याचे ढमणे यांनी सांगितले.समृध्दी मार्गाने बाधीत झालेल्या घरांचा मोबदला त्वरित देण्यात यावा, चिराड पाड्यात काही बेकायदेशीर केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द करावे, विशेष भूसंपादन अधिकारी, कमुनिकेटर प्रकाश गायकर, निलेश भोईर व इतर यांचे व त्यांचा नातेवाईकांचे सर्व आर्थिक व्यवहारांची स्वायत्त यंत्रने मार्फत चौकशी करण्यात यावी. भिवंडी आणि शहापूर तहसीलदारांची खोट्या व बोगस खरेदीखत प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याची मागणी देखील या उपोषणाच्या माध्यमातून जोरधरू लागली आहे.

टॅग्स :thaneठाणेShetkari Jagar Manchशेतकरी जागर मंच