शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

उल्हासनगर महापालिका कर्मचारी पगाराविना, कामगारांत असंतोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 7:15 PM

महापालिका आस्थापनावर दरमहा १९ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १२ कोटी निव्वळ कर्मचारी पगार, सेवानिवृत्त वेतनावर खर्च होतो. मालमत्ता कर विभागाकडून वर्षाला १०० कोटीच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ७१ कोटीची वसुली झाली.

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून कामगारांचे अद्यापही पगार झाला नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. कामगार संघटनेचे नेते राधाकृष्ण साठे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यावर सोमवारी वर्ग-४ कर्मचाऱ्यांचा पगार काढण्याचे आश्वासन दिले. 

उल्हासनगर महापालिका कारभारातील सावळागोंधळ पुन्हा उघड झाला. गेल्या महिन्यात शासनाकडून जीएसटी अनुदान मिळाले नसल्याचे कारण देऊन, अर्धा महिना संपल्यानंतर कामगारांचा पगार काढला होता. प्रत्यक्षात मालमत्ता कर विभागाने वसूल केलेली कोट्यवधींची रक्कम गेली कुठे? असा प्रश्न त्यावेळी कामगारांनी केली होती. कामगारांच्या पगारा ऐवजी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची देणी देण्यात धन्यता मानल्याची टीका त्यावेळी सर्वस्तरातून झाली. एप्रिल महिन्यात तरी वेळेत पगार होणार असे आश्वासन दिल्यानंतरही, महिन्याची १२ तारीख उलटूनही पगार झाला नाही. याप्रकारा बाबत कामगारानी नाराजी व्यक्त केली असून घराचे कर्ज हप्ते, इतर खर्च व देणी कसे द्यावी. असा प्रश्न कामगारांना पडला. कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी शुक्रवारी आंदोलन केल्याने, सोमवारी पगार काढण्याचे आश्वासन लेखा विभागाने दिल्याची माहिती साठे यांनी दिली. 

महापालिका आस्थापनावर दरमहा १९ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १२ कोटी निव्वळ कर्मचारी पगार, सेवानिवृत्त वेतनावर खर्च होतो. मालमत्ता कर विभागाकडून वर्षाला १०० कोटीच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ७१ कोटीची वसुली झाली. तर जीएसटी पोटी महापालिकेला शासनाकडून दरमहा १६ कोटी २५ लाखाचे अनुदान मिळते. या अनुदानावर महापालिकेचा कारभार हाकलला जात आहे. मात्र लेखा विभागाकडून कामगारांच्या पगाराला प्राधान्य न देता, ठेकेदारांच्या देणीला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत आहे. कामगारांच्या पगारा बाबत महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्या सोबत संपर्क साधला असता, होऊ शकला नाही. तर उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी काही तांत्रिक कारणामुळे पगार रखडल्याचे सांगून सोमवारी पगार होण्याचे संकेत दिले. 

लेखा विभागाकडून उशीर का? टक्केवारीची चर्चा 

महापालिका मालमत्ता कर विभागाने ७१ कोटींची वसुली केल्यानंतरही कामगारांचे पगार वेळेत का नाही?. असा प्रश्न कामगार संघटनेचे नेते विचारीत आहेत. शासनाचे जीएसटी अनुदान एकाद्या महिन्यात उशिराने दिलीतर, कामगारांचा पगार देणार नाही का? असा प्रश्न निर्माण झाला. ठेकेदारांच्या देण्यातून टक्केवारी मिळत असल्यानेच, कामगारांच्या पगार ऐवजी ठेकेदारांची बिले देण्याला प्राध्यान्य दिले जात असल्याचा आरोप कामगार नेते करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर