शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वीस तास आग, ३० कोटींचा बांबू खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:01 IST

अग्नितांडवामुळे बल्लारपूर - आलापल्ली मार्ग आठ तास बंद

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर (जि. चंद्रपूर) : वणवा भडकून कळमना बांबू डेपोला रविवारी लागलेली आग तब्बल २० तास धुमसत होती. त्यात ५० हजार टन बांबू व निलगिरीचे लाकूड खाक झाले असून, ३० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बल्लारपूरहून आलापल्लीकडे कळमना मार्गाने जाणारी वाहतूक आगीमुळे आठ तास बंद ठेवण्यात आली होती. आग अजूनही पूर्णपणे विझलेली नाही.  कळमनाच्या चोरमोडी नाल्याजवळ कोणी तरी आग लावल्यामुळे रविवारी सकाळपासून वणवा पेटला होता. तो अधिक भडकून बांबू डेपोपर्यंत गेला व  डेपोला आग लागली. 

२५ अग्निशमन बंब दाखल  आग विझविण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथील अग्निशमन दलाचे बंब व पथक दाखल झाले. बल्लारपूर नगर परिषद, चंद्रपूर महानगरपालिका, दुर्गापूर, घुग्गुस, नागभीड, भद्रावती, राजुरा, गडचांदूर, आवारपूर, उपरवाही, नागपूर, गडचिरोली, चामोर्शी येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या २५ पथकांनी २० तास अविरत मेहनत घेऊन आग बऱ्यापैकी आटोक्यात आणली.

पेट्रोलपंप पूर्ण जळालेडेपो पूर्णपणे जळाल्यानंतर आगीने जवळच्या पेट्रोलपंपालाही कवेत घेतले. सुदैवाने पंप चार दिवसांपासून बंद असल्याने पंपात पेट्रोल आणि डिझेलचा केवळ मृत साठा होता. मात्र, पंप जळाल्याने पंपमालक फुलझेले यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. 

आग कशाने लागली, याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. दोन दिवसांपासून सर्व प्रशासन मिळून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. नुकसान किती झाले, हे सांगता  येणार नाही. अजूनही नुकसान मोजणीचे काम सुरू आहे. - संजय राईंचवार, तहसीलदार, बल्लारपूर

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलbadlapurबदलापूर