शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राष्ट्रवादीला स्पर्धेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 4:31 AM

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात व्हावी, याकरिता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांनाच लक्ष्य केले आहे.

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात व्हावी, याकरिता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांनाच लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने डावखरे यांच्यावर गद्दारीचा आरोप करून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवार असले, तरी शिवसेना, भाजपाने आपल्या संघर्षात राष्ट्रवादीच्या तिसऱ्या उमेदवाराचीही मतदारांनी दखल घेऊ नये, अशी परस्परांवर चिखलफेक सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.‘गद्दाराला धडा शिकवा’ ही राष्ट्रवादी काँग्रेसची हाक असून, त्यांचे लक्ष्य डावखरे हेच आहे. निरंजन यांना लक्ष्य करताना सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले गेले. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा कोकण पदवीधर मतदार संघ मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजपाकडून पदवीधरांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला लक्ष्य केले आहे.येत्या २५ जून रोजी कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता मतदान होणार असून, मतमोजणी २८ जूनला आहे. कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का देण्यात शिवसेना यशस्वी झाली, तर विधान परिषदेतील त्यांचे संख्याबळ वाढेल. सध्या विधान परिषदेत भाजपाचे स्पष्ट बहुमत नाही. जुलै महिन्यात विधानसभेतील सदस्यांनी मतदान केल्याने, विधान परिषदेवर निवडून जाणाºया सदस्यांची निवड झाल्यावर भाजपा बहुमतात येईल. तत्पूर्वी कोकण व मुंबई पदवीधर या दोन्ही मतदार संघांवर वर्चस्व मिळवून भाजपाची डोकेदुखी वाढविणे हाच शिवसेनेचा हेतू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक असो की, पालघर लोकसभा पोटनिवडणूक भाजपा-शिवसेनेने परस्परांवर टीका करून, उत्तम यश संपादन केले आहे. तोच पॅटर्न पदवीधर निवडणुकीत अंमलात आणला जात आहे.निरंजन डावखरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ते विजयी झाले, तर भाजपासारख्या नव्या पक्षातही त्यांची राजकीय कारकीर्द बहरेल. मात्र, पराभव झाला तर ना घर का ना घाट का, अशी स्थिती होईल>पदवीधरांसाठी कोणत्याही योजना आणलेल्या नाहीतमित्राला जागा सोडत गेल्याने भाजपा कमी झाली, परंतु आता पालघरपाठोपाठ कोकण पदवीधरच्या निमित्ताने जी संधी आली, त्या संधीचे सोने करत कोकण पुन्हा आपल्याकडे घ्यायचे असल्याचा नारा भाजपाने दिला आहे. अर्थात, हे स्वप्न साकार करताना त्यांचा उमेदवार हा आयात आहे व संघ परिवाराच्या संस्कारांत वाढलेले पदवीधर तो कसा स्वीकारतात, याबाबत उलटसुलट दावे केले जात आहेत. भाजपाने पदवीधरांसाठी कोणत्याही योजना आणलेल्या नाहीत. केंद्र सरकार यामध्ये सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप शिवसेनेचा आहे. शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे जंगजंग पछाडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक हे मैदानात उतरले आहेत, परंतु सभेच्या ठिकाणी नाईक आणि आव्हाडांमध्ये आजही धग जाणवते. हे दोघे उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी एकमेकांवरच टीका करण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारावरील आरोप व दाखल गुन्हेही त्या पक्षाकरिता डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.