शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

जीवघेणा प्रवास... पूलच पाण्याखाली गेल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 08:12 IST

हेदुचापाडा येथे पक्का रस्ताच नसल्याने पावसाळ्यात तुटतो संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्क शहापूर : तालुक्यातील हेदुचापाडापासून मुख्य रस्त्याला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने, एका ओहळातून पाड्यातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो. ग्रामस्थांनी एका ओहळावर लाकूड-काठ्या टाकून लाकडी पूल बनविला आहे. मात्र, हा पूलच आता पाण्याखाली गेल्याने शाळेत कसे जायचे, हाच प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनाही बाजारात, कामाच्या ठिकाणी, दवाखान्यात जाण्यासाठी याच रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही पिढ्याच या स्थितीमध्ये भरडल्या गेल्याचे ग्रामस्थांचे अनुभव आहेत.

तालुक्यातील हेदुचापाडा येथील ओहोळावरील कच्चा पूल पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटतो. पिवळी ग्रामपंचायत हद्दीत हेदुचापाडा पाड्यातील आदिवासींची  एकूण १९ घरे आहेत. या पाड्यातील एकूण २३ विद्यार्थी शाळेत जातात. विद्यार्थ्यांना  मुख्य रस्त्यावर कोशिंबडे गावापर्यंत येण्यासाठी ओहोळ ओलांडूनच  यावे लागते. ओहळावर ग्रामस्थांनी लाकडी-काठ्यांचा पूल बनविला आहे. पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. हाच एकमेव मार्ग असल्याने, पाणी कमी होईपर्यंत त्या गावातील ग्रामस्थांचा संपर्क तुटतो. 

रताळेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पाड्यातील विद्यार्थी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतात, तर पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण पिवळी येथील किल्ले माहुली शाळेत घेतात. या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दीड किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्ता गाठावा लागतो. मात्र, पावसाळ्यात पूलच पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांची पूर्ण गैरसोय होत आहे. 

आंदोलनाचा इशाराश्रमजीवी संघटनेचे  ठाणे जिल्हा कातकरी उपप्रमुख मालू हुमणे, तालुका सचिव प्रकाश खोडक, तालुका युवा प्रमुख रूपेश आहिरे यांनी परिस्थितीची पाहणी केली. अनेकदा तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे या रस्त्यासाठी लेखी मागणी केली. जानेवारीत शहापूर पंचायत समितीवर तालुक्यातील आदिवासी गाव-पाड्यांना जोडणारे मुख्य रस्ते तयार व्हावेत, यासाठी श्रमजीवीतर्फे  मोर्चाही काढला होता. एकूण ६५ रस्त्यांपैकी फक्त  पाचच रस्ते बनविण्यात आले. उर्वरित रस्त्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याने, आंदोलनाचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. 

आमची एक पिढी संपली. आता दुसरी पिढी सुरू आहे. आमच्या नशिबी असाच प्रवास आहे. पावसाळ्यात चार महिने म्हणजे तारेवरची कसरत असते. रस्ता नाही, वीज नाही, जास्त पाऊस झाल्यास संपर्क तुटतो. मुलांची शाळेला दांडी होते.- राजेश कोदे, ग्रामस्थ, हेदुचापाडा

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसSchoolशाळा