शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

आदिवासींचे उभे पीक जेसीबीद्वारे केले नष्ट, १६० गुंठे क्षेत्रावरील पिकाचे नुकसान   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 2:13 AM

येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे.

ठाणे : कल्याण तालुक्यातील कांबा गावाजवळील वाघेरेपाडा येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांवर व कापणीच्या गवतावर रविवारी रात्री ट्रॅक्टर व जेसीबी फिरवून ते नष्ट केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडा टिटवाळा पोलीस ठाण्यात सोमवारी केली.येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे. सुरेश हिंदोळे यांच्या १२० गुंठे शेतीवरील पिकासह काथोड पुजारी यांचे व सावळाराम पुजारी या दोघा शेतकऱ्यांचे प्रत्येक २० गुंठे शेतातील पिकांचे प्रत्येकी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या शेतजमिनीवर अतिक्रमण करण्याच्या हेतूने दसऱ्याच्या दिवशी हे कृत्य करणाऱ्यांच्या नावाचा उल्लेखही या शेतकऱ्यांनी तक्रारीत केला आहे.आदिवासींच्या या शेतजमिनीच्या वादासंबंधी याआधीही कल्याण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसीटीचे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यास न जुमानता पीक नष्ट करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, एफआयआर नोंदवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावले आहे, पण ते येत नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती