शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

मैदानांत बांधकाम बंदीचा वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय; उद्यानांमध्ये २० टक्केच बांधकामाला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 1:11 AM

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ठाणे : ठाणे शहरात आधीच खेळाची मैदाने आणि उद्याने कमी राहिली आहेत. आहेत त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. काही उद्याने आणि मैदानांच्या आड समाज मंदिर अथवा इतर काही कट्टे सुरु आहेत. ते आता उर्वरित मैदाने अथवा उद्यानांमध्ये असणार नाहीत. यापुढे उद्यानांमध्ये केवळ २० टक्के बांधकामाला परवानगी दिली जाणार असून, खेळाच्या मैदानांमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम होऊ दिले जाणार नसल्याचे मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षेताखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत सदस्य विक्रांत तावडे यांनी या मुद्याला हात घातला. शहरातील उद्यानांची दूरवस्था झालेली आहे. खेळाच्या मैदानांच्या ठिकाणी बांधकामे होत आहेत. त्यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांचा फारसा विरंगुळा होताना दिसत नाही. खेळाच्या मैदानांच्या ठिकाणीदेखील समाज मंदिर उभारण्याच्या नादात मैदानावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यापुढे उद्यानांमध्ये कमीतकमी बांधकाम, म्हणजेच सिव्हील वर्क व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याअनुषगांने आयुक्तांनी उद्यानांमध्ये २० टक्केच बांधकामांना यापुढे परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले. इतर कोणतेही बांधकाम उद्यानांत होणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. मैदानांमध्ये संरक्षक भिंतीखेरीज इतर कोणतेही बांधकाम यापुढे होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाण्यात लवकरच फ्लॉवर गार्डन; घोडबंदरला घेणार जागेचा शोधनाशिक, कोलकाता, उटी आदी ठिकाणी फ्लॉवर गार्डन आणि बॉटनिकल गार्डन विकसित केले आहे. आता ठाण्यातही फ्लॉवर गार्डन विकसित करण्याची तयारी ठाणे महापालिकेने केली आहे. यासंदर्भात मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय झालो. त्यामुळे बॉटनिकलच्या विद्यार्थ्यांनाही उद्यानाचा फायदा होऊ शकणार असल्याचे मत प्राधिकरण सदस्य नम्रता भोसले यांनी व्यक्त केले. त्यानुसार घोडबंदर परिसरात जागेचा शोध घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विषयांच्या अनुषगांना भोसले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कोलकाता, उटी, नाशिक आदींसह देशाच्या बहुतेक महानगरांमध्ये अशा पद्धतीने उद्याने विकसित होत आहेत. ठाण्यात दरवर्षी वृक्षवल्लीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या आणि फुलांची ओळख होत असते. या प्रदर्शनाला ठाणेकरांचा दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असतो. परंतु,आता प्रदर्शन भरवतानाच खºया अर्थाने अशा प्रकारचे उद्यान ठाण्यातच तयार केले तर त्याचे अनेक फायदे होणार असल्याचे यावेळी सदस्यांनी सांगितले. पर्यटनस्थळ म्हणूनही ते विकसित होऊ शकणार आहे. तसेच बॉटिनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना येथे प्रत्यक्षात अभ्यास करण्याची संधीदेखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे असे उद्यान विकसित करावे अशी मागणी भोसले यांनी केली. त्यानुसार याचा अभ्यास करून येत्या काळात त्यादृष्टीने काय करता येईल, हे निश्चित केले जाणार आहे. यासाठी घोडबंदर भागातील मुल्ला बाग येथील उद्यानाच्या एका पार्टमध्ये हे उद्यान विकसित करता येऊ शकते का, याचाही अभ्यास केला जाणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका