शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
2
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
3
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
4
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
5
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
6
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
7
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
8
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
10
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
11
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
12
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
13
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
14
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
15
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
16
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
17
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
19
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
20
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

श्वेतपत्रिका नव्हे, वस्तुस्थिती मांडणार परिवहन प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 00:43 IST

बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन सेवेचीही अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधोरेखित केली होती.

ठाणे : बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन सेवेचीही अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधोरेखित केली होती. परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीसुध्दा यावेळी करण्यात आली आहे.पुढील महासभेत श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे; मात्र श्वेतपत्रिका नव्हे, तर परिवहनची वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे परिवहन आजही सक्षम असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे.बेस्ट कामगारांनी ९ दिवस संप पुकारला होता. भविष्यात ठाणे परिवहन सेवेची अशीच अवस्था होऊ शकते. त्यामुळे परिवहनच्या कारभारावर राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि गटनेते हणमंत जगदाळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आक्षेप घेतला. जीसीसी कंत्राटावरच त्यांनी आक्षेप घेतला असून, चुकीच्या ठेक्यामुळे परिवहनचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला.आता १५० बसेस दुरुस्त करुन त्यासुध्दा जीसीसीवर चालविण्याचा घाट घातला जात असल्यावरही त्यांनी आक्षेप नोंदविला. जीसीसी पध्दतीने परिवहनचे रोजचे ९ लाखांचे नुकसान होत असून वर्षाकाठी हा तोटा तब्बल ३२ कोटींच्या घरात जात असल्याचे त्यांनी लक्षवेधीच्या स्पष्ट केले.परिवहन सेवेमध्ये आस्थापनेवर केवळ २० ते ३० टक्के वाहन चालक काम करीत आहेत. परंतु परिवहन या सर्व कामगारांचा पगार काढत आहे. त्यामुळे आस्थापनेवर ७३ कोटी ८१ लाखांचा खर्च होत आहे. त्यात जीसीसीचा चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव तयार करण्यात आल्याने परिवहनला अंदाजे ५० कोटींच्यावर तोटा सहन करावा लागत असल्याचा मुद्दासुध्दा त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय इतरही मुद्दे उपस्थित करीत पुढील महासभेत परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ३१७ बसेस आहेत. दुरुस्तीअभावी १०० हून अधिक बसेस वागळे आणि कळवा आगारात उभ्या आहेत. यातील ४५ बसेसची दुरुस्तीची मोठी कामे शिल्लक असून उर्वरित बसेस या किरकोळ दुरुस्तीसाठी उभ्या आहेत. या बसेस दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच दुरुस्तीचे काम केले जाईल, असे परिवहनचे मत आहे.परिवहनच्या ताफ्यातील ३०० बसेसपैकी वागळे आणि कळवा आगारातून ८० बसेस बाहेर पडत असून, ३० पैकी २७ एसी व्होल्वो बसेस बाहेर पडत आहेत. जीसीसी तत्वावरील १९० पैकी १८० बसेस रस्त्यावर धावत असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे. परिवहनचे दिवसाचे उत्पन्न हे २९ ते ३० लाखांच्या घरात आहे.जास्तीचे उत्पन्न मिळणारपरिवहनच्या ताफ्यातील १५० बसेसची दुरुस्ती करुन त्या जीसीसीवर चालविल्यास भविष्यातील दुरुस्तीचा खर्च वाचणार आहे. जास्तीचे उत्पन्न मिळणार असल्याचा दावाही परिवहनने केला आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे परिवहनचा कारभार आजही सुरळीत आहे. परिवहन सेवेत सुधार करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोणतीही सार्वजनिक सेवा केव्हाही फायद्यात नसते. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठीच विविध उपाय केले जात असल्याचे मत परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिवहनची जी वस्तुस्थिती आहे, तीच महासभेत मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.