शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
4
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
5
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
6
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
7
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
9
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
10
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
11
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
12
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
13
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
14
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
15
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
16
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
17
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
18
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
19
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
20
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान

श्वेतपत्रिका नव्हे, वस्तुस्थिती मांडणार परिवहन प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 00:43 IST

बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन सेवेचीही अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधोरेखित केली होती.

ठाणे : बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन सेवेचीही अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधोरेखित केली होती. परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीसुध्दा यावेळी करण्यात आली आहे.पुढील महासभेत श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे; मात्र श्वेतपत्रिका नव्हे, तर परिवहनची वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे परिवहन आजही सक्षम असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे.बेस्ट कामगारांनी ९ दिवस संप पुकारला होता. भविष्यात ठाणे परिवहन सेवेची अशीच अवस्था होऊ शकते. त्यामुळे परिवहनच्या कारभारावर राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि गटनेते हणमंत जगदाळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आक्षेप घेतला. जीसीसी कंत्राटावरच त्यांनी आक्षेप घेतला असून, चुकीच्या ठेक्यामुळे परिवहनचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला.आता १५० बसेस दुरुस्त करुन त्यासुध्दा जीसीसीवर चालविण्याचा घाट घातला जात असल्यावरही त्यांनी आक्षेप नोंदविला. जीसीसी पध्दतीने परिवहनचे रोजचे ९ लाखांचे नुकसान होत असून वर्षाकाठी हा तोटा तब्बल ३२ कोटींच्या घरात जात असल्याचे त्यांनी लक्षवेधीच्या स्पष्ट केले.परिवहन सेवेमध्ये आस्थापनेवर केवळ २० ते ३० टक्के वाहन चालक काम करीत आहेत. परंतु परिवहन या सर्व कामगारांचा पगार काढत आहे. त्यामुळे आस्थापनेवर ७३ कोटी ८१ लाखांचा खर्च होत आहे. त्यात जीसीसीचा चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव तयार करण्यात आल्याने परिवहनला अंदाजे ५० कोटींच्यावर तोटा सहन करावा लागत असल्याचा मुद्दासुध्दा त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय इतरही मुद्दे उपस्थित करीत पुढील महासभेत परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ३१७ बसेस आहेत. दुरुस्तीअभावी १०० हून अधिक बसेस वागळे आणि कळवा आगारात उभ्या आहेत. यातील ४५ बसेसची दुरुस्तीची मोठी कामे शिल्लक असून उर्वरित बसेस या किरकोळ दुरुस्तीसाठी उभ्या आहेत. या बसेस दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच दुरुस्तीचे काम केले जाईल, असे परिवहनचे मत आहे.परिवहनच्या ताफ्यातील ३०० बसेसपैकी वागळे आणि कळवा आगारातून ८० बसेस बाहेर पडत असून, ३० पैकी २७ एसी व्होल्वो बसेस बाहेर पडत आहेत. जीसीसी तत्वावरील १९० पैकी १८० बसेस रस्त्यावर धावत असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे. परिवहनचे दिवसाचे उत्पन्न हे २९ ते ३० लाखांच्या घरात आहे.जास्तीचे उत्पन्न मिळणारपरिवहनच्या ताफ्यातील १५० बसेसची दुरुस्ती करुन त्या जीसीसीवर चालविल्यास भविष्यातील दुरुस्तीचा खर्च वाचणार आहे. जास्तीचे उत्पन्न मिळणार असल्याचा दावाही परिवहनने केला आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे परिवहनचा कारभार आजही सुरळीत आहे. परिवहन सेवेत सुधार करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोणतीही सार्वजनिक सेवा केव्हाही फायद्यात नसते. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठीच विविध उपाय केले जात असल्याचे मत परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिवहनची जी वस्तुस्थिती आहे, तीच महासभेत मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.